पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडले जाणार, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे:  तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर (Kundmala Bridge Collapses), पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिल्या असून,  या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.


मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल रविवारी कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावं आणि वस्त्यांना जोडणाऱ्या सर्व जुन्या लोखंडी पादचारी पूलांची अवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण, जिल्ह्यात असे अनेक लोखंडी पूल आहेत, जे धोकादायक स्थितीत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढे देखील अशी घटना घडण्याचा संभव अधिक असल्यामुळे, हे सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.


पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले शांत आणि जास्त वर्दळ नसलेले स्थळ म्हणून कुंडमळा ओळखले जाते. इंद्रायणी नदी आणि कुंडराई देवीचे मंदिर तसेच नजीक असलेले छोटेसे धरण यामुळे कुंडमळाचा निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. त्यात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याकारणामुळे शे-दोनशे पर्यटकांनी  या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.



एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक पुलावर आल्याने पूल कोसळला


एरव्ही शांतता आणि कमी वर्दळ असलेल्या या ठिकाणी रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. १०० ते १५० पर्यटक पुलावर उभे होते. फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी पुलावर एकच गर्दी केली होती. त्याचवेळी इंद्रायणी नदीचा प्रवाह देखील प्रचंड होता, शिवाय पूल देखील ३० वर्ष जुना गंजलेल्या अवस्थेमध्ये होता. त्यामुळे, पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल मधोमध तुटून कोसळला. ज्यामध्ये अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर काही पूलाखाली अडकून पडले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जणांना वाचवण्यात यश आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला गेला.


Comments
Add Comment

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम