पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडले जाणार, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे:  तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर (Kundmala Bridge Collapses), पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिल्या असून,  या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.


मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल रविवारी कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावं आणि वस्त्यांना जोडणाऱ्या सर्व जुन्या लोखंडी पादचारी पूलांची अवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण, जिल्ह्यात असे अनेक लोखंडी पूल आहेत, जे धोकादायक स्थितीत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढे देखील अशी घटना घडण्याचा संभव अधिक असल्यामुळे, हे सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.


पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले शांत आणि जास्त वर्दळ नसलेले स्थळ म्हणून कुंडमळा ओळखले जाते. इंद्रायणी नदी आणि कुंडराई देवीचे मंदिर तसेच नजीक असलेले छोटेसे धरण यामुळे कुंडमळाचा निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. त्यात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याकारणामुळे शे-दोनशे पर्यटकांनी  या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.



एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक पुलावर आल्याने पूल कोसळला


एरव्ही शांतता आणि कमी वर्दळ असलेल्या या ठिकाणी रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. १०० ते १५० पर्यटक पुलावर उभे होते. फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी पुलावर एकच गर्दी केली होती. त्याचवेळी इंद्रायणी नदीचा प्रवाह देखील प्रचंड होता, शिवाय पूल देखील ३० वर्ष जुना गंजलेल्या अवस्थेमध्ये होता. त्यामुळे, पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल मधोमध तुटून कोसळला. ज्यामध्ये अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर काही पूलाखाली अडकून पडले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जणांना वाचवण्यात यश आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला गेला.


Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात