VI Breaking News: वोडाफोन आयडीयाचे अस्तित्वच धोक्यात कंपनीकडे थकबाकी द्यायलाही पैसे नाहीत !

प्रतिनिधी: वोडाफोन आयडिया (VI) चे भविष्य धोक्यात आले आहे का? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या वोडाफोन आयडिया आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. यामुळे वोडाफोन आयडिया स्पेक्ट्रम वापर शुल्कावरील थकबाकी माफ न झाल्याने व्होडाफोन आयडिया (VI) ला टेलिकॉम ऑपरेटरच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल चिंता आहे. आर्थिक संकटात जात असल्याने सरकार वोडाफोन आयडियाला 'रिलीफ पॅकेज ' देण्याच्या तयारीत असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.


दिलेल्या वृत्तानुसार, सरकारचे म्हणणे आहे की, सरकारचा वीआयवर नियंत्रण करण्याचे लक्ष नाही. अँरियरच्या बदली ४९ टक्क्यांहून अधिक इक्विटी समभाग (Equity Shares) विकत घेण्याचा सरकारचा कुठलाही इरादा नाही असा संदेश सरकारने याप्रसंगी दिला आहे. सध्या सरकार वीआयची आर्थिक परिस्थिती टाळ्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत आहे. असे असले तरी वीआय २० वर्षातील थकित अँरियरच्या (Arrears) मधून पैसे देऊ शकेल का किंवा कंपनीच्या इतर उत्पन्न साधनातून पैसे देऊ शकतील का असे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अजून सरकारने यातील कुठलाही मार्ग अंतिम असल्याची पुष्टी दिलेली नाही. कंपनीच्या गेल्या काही वर्षांत कॅश फ्लो (Cash Flow) मध्ये होणारी घट पाहता कंपनीच्या आर्थिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.


याशिवाय सरकारने सांगितल्याप्रमाणे ' कंपनीकडे २०२८-२९ पर्यंतच पुरेशी कॅश फ्लो उपलब्ध आहे.' त्यानंतर जर पुरेसा निधी नसल्यास कंपनीला दैनंदिन कामाकरिताही संकटाला तोंड द्यावे लागू शकते.विशेष म्हणजे, व्होडाफोन आयडिया च्या सीईओ अक्षया मुंद्रा यांनी गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'भारत सरकारच्या (एजीआर) एजीआरवर वेळेवर पाठिंब्याशिवाय, व्हीआयएल आर्थिक वर्ष २६ नंतर काम करू शकणार नाही जर बँक निधीच्या चर्चा पुढे जाणार नाहीत'.डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (Department of Telecommunication) कडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ पर्यंत कंपनीला १८०६४ कोटींची थकबाकी देणी भरायची आहेत. मात्र जरी ती भर ली तरी पुढील वर्षापर्यंची देणी (Liability) देणे कंपनीला अशक्य आहे.


प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टनुसार जरी कंपनीला थोडी सरकारने देणी माफ केली तरी आर्थिक वर्ष २०२७-२०२८ नंतर कंपनीकडे त्यापुढील पैसे भरण्यासाठी निधीची कमतरता असू शकते. जानेवारी ते मार्चपर्यंत कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला होता. कंपनीचा निव्वळ तोटा (Net Profit) हा ७१६६ कोटी इतका होता. यापूर्वी मे महिन्यात न्यायालयात देखील वीआयने याचिका दाखल करत भाष्य केले होते की, बँकेच्या निधी न मिळाल्यास येणाऱ्या आर्थिक वर्षात आम्ही ऑपरेट करू शकत नाही.

Comments
Add Comment

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Gold-Silver Rate: व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदाराला दागिने गिफ्ट म्हणून द्या; जाणून घ्या आजचे दर

मुंबई: आज संपूर्ण देशात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये बोगस

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

Sunetra Pawar: राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीकडे जाणार ? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुंबई: अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.