मुख्यमंत्र्यांकडील खात्यांना सर्वाधिक निधी

शिवेंद्रराजे, अदिती तटकरे टॉपवर; सत्ताकारण आणि अर्थकारणाचा समतोल साधण्याचा फडणवीसांचा प्रयत्न


मुंबई (सुहास शेलार) : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सत्ताकारण आणि राज्याच्या विकासाचे अर्थकारण यांचा अचूक समतोल साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे असलेल्या ऊर्जा, नियोजन आणि गृह या महत्त्वाच्या खात्यांना ४० हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद करून फडणवीसांनी सत्तेचे आणि तिजोरीचे केंद्र स्वतःकडेच राखले आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अदिती तटकरे यांच्याकडील खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला आहे.


राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ऊर्जा विभागाला २७ हजार ९६३.३६ कोटी रुपयांचा भरीव निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ रस्ते विकास आणि दळणवळणाचे जाळे सक्षम करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला २६ हजार २१८.१६ कोटी रुपयांचे बळ देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आणि सार्वजनिक उपक्रम विभागांना एकत्रित १३ हजार ९७० कोटींचा निधी मिळाला आहे.


महिला आणि बालविकास मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी वैयक्तिक विभागाच्या निधी वाटपात मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या विभागासाठी २४ हजार २३१.२८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास विभागाला १३ हजार ६५१.२० कोटी रुपयांची रसद पुरवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या पायाभूत प्रकल्पांना निधीची कमतरता भासू नये, ही काळजी घेतानाच सामाजिक समतोल साधण्यासाठी ओबीसी कल्याण आणि आरोग्य विभागालाही सन्मानजनक वाटा देण्यात आला आहे. थोडक्यात, हा अर्थसंकल्प विकासकामांच्या नावाखाली राजकीय गणिते जुळवणारा 'बॅलन्स शीट' ठरला आहे.


बळीराजा आणि सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमावर


कृषी क्षेत्रासाठी दत्तात्रय भरणे (कृषी विभाग - ९ हजार ५८३.४० कोटी) आणि संजय राठोड (मृद व जलसंधारण - ४ हजार ४१६.८८ कोटी) यांच्या माध्यमातून मोठी तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदा विभागासाठी १६ हजार ५६९.२८ कोटी रुपये देऊन प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्धार अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


सर्वाधिक निधी मिळालेले १० मंत्री (रक्कम कोटींमध्ये)


१. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) - ऊर्जा, नियोजन, गृह - ४०,०१६.९१


२. शिवेंद्रसिंहराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम - २६,२१८.१६


३. आदिती तटकरे - महिला व बालविकास - २४,२३१.२८


४. विखे-पाटील / महाजन - जलसंपदा - १६,५६९.२८


५. एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, एमएसआरडीसी - १३,९७०.३२


६. जयकुमार गोरे - ग्रामविकास - १३,६५१.२०


७. दत्तात्रय भरणे - कृषि - ९,५८३.४०


८. अतुल सावे - ओबीसी व दिव्यांग कल्याण - ६,८२९.७६


९. प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य - ५,९८०.०८


१०. संजय राठोड - मृद व जलसंधारण - ४,४१६.८८

Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास