उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पुढे आलीय.


अमरोहा येथील त्रासी गावापासून २ किलोमीटर अंतरावर जंगलात फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. कारखान्यात सुमारे २५ पुरुष आणि महिला काम करत होते. यादरम्यान, एका कामगाराच्या मुलाने फटाके पेटवले. त्यानंतर, जवळच ठेवलेले फटाके आणि गनपावडरला आग लागली. सुमारे १५ मिनिटे हे स्फोट सुरू राहिले.


स्फोटानंतर कारखान्याचा ढिगारा 300 मीटरपर्यंत पसरला. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्फोटाचा आवाज आणि धुराचे लोट ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथके घटनास्थळी पोहोचली. ढिगाऱ्याखाली गाडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू झाले. जिल्हाधिकारी निधी गुप्ता आणि एसपी अमित कुमार आनंद घटनास्थळी पोहचल्यात.

Comments
Add Comment

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत

Crude Oil Purchases : भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ; आफ्रिकेसह अमेरिका, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची खरेदी वाढली

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर

Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू