कर्जतचे भूमिपुत्र केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी

कर्जत :पोलीस विभागातील कर्जतचे पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल या दोन्ही भूमिपुत्रांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाने पुण्यात सन्मानित करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तोरडमल हे १९९५ साली पोलीस खात्यात रुजू झाले.


गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात येते.यंदाचा केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक पुरस्कार पोलीस खात्यात सेवा देत असलेले कर्जतचे भूमिपुत्र लातूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांना १३ जून रोजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद,पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंप्री चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी ऑगस्ट २०२१ साली पामबीच वाशी येथील पुलाखाली एका वृद्धेच्या कोणताही ठोस पुरावा नसताना आपले कौशल्य वापरत हत्येचा गुन्हा उघडकीस आणला होता.यासह त्यांनी बॉम्बस्फोट प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली.तर राऊत हे पुणे जिल्ह्यात कार्यरत असताना ऑक्टोबर २०२१ मध्ये शिरूर घोडनदी पोलिस स्टेशन अंतर्गत पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवरील दरोड्याचा तपास त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता.


दिवसाढवळ्या पाच दरोडेखोरांनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून अडीच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती. पोलीस उपअधीक्षक राऊत यांनी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने त्याचा छडा लावत अवघ्या दहा दिवसांत पाचही आरोपींना अटक करीत संपूर्ण अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. दोन्ही भूमिपुत्रांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाने सन्मानित करण्यात आल्याने त्याचे कर्जतमध्ये कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव

Raigad Accident : जेएनपीटी परिसरात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण