कामाचा आदेश निघताच पाच दिवसात कुंडमळाचा जुना पूल कोसळला

पुणे : कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला पादचारी साकव कोसळून भीषण दुर्घटना घडली. ३५ वर्षे जुना असलेला हा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाची मुदत संपल्यानं तो दळणवळणासाठी धोकादायक बनला होता. या पुलाचा वाहतूकीसाठी वापर करू नये अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. पण शॉर्टकट असल्यानं या पुलाचा वापर केला जात होता.


साकव ३५ वर्षे जुना झाल्यानं नव्या पुलाचा प्रस्ताव देण्यात आला होता. ग्रामस्थांकडून नव्या पुलाच्या उभारणीची मागणी होत होती. डिसेंबर २०२२ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नव्या पुलाचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केली होती. त्यानंतर ११ जुलै २०२४ रोजी साडे आठ कोटी रुपये खर्चाच्या जोड रस्त्यासह मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली होती. इतकंच नव्हे तर नव्या पुलाच्या कामाचा निधी आल्यानंतर त्याचं काम सुरू करण्यासाठी आदेशही निघाला होता. आदेश निघाल्यानंतर पाचच दिवसात हा पूल कोसळून ही दुर्घटना घडलीय. नव्या पुलाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी ८ कोटी निधी दिला जाणार आहे. साकव पुलाजवळच नवा पूल उभारण्याचं नियोजन होतं. हा प्रस्तावित पूल १७० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंदीचा असणार आहे. या पुलाचा कार्यरंभ आदेश काढण्यात आल्याच्या पाच दिवसातच जुना पूल कोसळला आहे. जुन्या पुलासाठी २० लाखांचा खर्च करण्यात आला होता.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये