तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. त्यामुळे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे परत उतरले. अधिकारी सध्या तांत्रिक समस्येचे नेमके कारण काय आहे याची तपासणी करत आहेत.

बोईंग७८७-८ ड्रीमलाइनरच्या या विमानाने हाँगकाँगहून नियोजित वेळेत उड्डाण केले होते.मात्र, उड्डाणानंतर वैमानानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय आला आणि त्याने हे विमान परत माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरल्यानंतर तांत्रिक समस्येचे स्वरूप अद्याप कळू शकलेले नाही.

एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एआय-३१५ हे विमान "तांत्रिक समस्येमुळे" हाँगकाँगला परतले आहे. दरम्यान,एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी हाँगकाँगहूनउड्डाण केले आणि एका तासापेक्षा जास्त वेळानंतर ते खाली उतरले.
Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात