BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली अन्…

मुंबई : मुंबईमधून गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्डयात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली आणि त्यामुळे रस्ताही मोठ्या प्रमाणात खचल्याचे पाहायला मिळाले. या बेस्ट बसचा खड्ड्यात पडल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी ९.०० ते ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्त्याखाली खोदकाम सुरू असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचलेला होता. याच खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला.



दरम्यान, सिमेंटचे रस्ते जे बांधले गेले त्या रस्त्याला बेस द्यायचं असतो. पण टेक्निकली गोष्टी घाईघडबीत झाल्या आहेत. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले.


या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी त्यांच्यावरही हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल