BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली अन्…

मुंबई : मुंबईमधून गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्डयात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली आणि त्यामुळे रस्ताही मोठ्या प्रमाणात खचल्याचे पाहायला मिळाले. या बेस्ट बसचा खड्ड्यात पडल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी ९.०० ते ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्त्याखाली खोदकाम सुरू असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचलेला होता. याच खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला.



दरम्यान, सिमेंटचे रस्ते जे बांधले गेले त्या रस्त्याला बेस द्यायचं असतो. पण टेक्निकली गोष्टी घाईघडबीत झाल्या आहेत. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले.


या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी त्यांच्यावरही हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य