Bachchu Kadu यांना बँकेच्या संचालकपदावरून का हटवले? जाणून घ्या सविस्तर

  100

उपोषण संपवल्यानंतर बच्चू कडू यांना सहनिबंधकांकडून धक्का 


अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते.  सात दिवसांनंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले, प्रकृती खालवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या संदर्भात वेगळीच बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे, बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून काढण्यात आले आहे. त्यांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत हा निर्णय सहनिबंधकांनी दिला आहे. मात्र यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे अधिक आहेत.


2017 रोजी नाशिक मध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत माजी आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या नियमानुसार जर संचालकाला एक वर्षाची शिक्षा सुनावली गेली असेल, तर तो व्यक्ती संचालक पदी कायम राहण्यास अपात्र ठरतो. या नियमाचा आधार घेत जिल्हा सहकारी बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडू यांच्या विरोधात विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती.


दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होते. त्यावेळी बच्चू कडू यांना दिलासा देखील देण्यात आला होता. आता पुन्हा विभागीय सहनिबंधकांनी न्यायालयाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सरकारकडून बच्चू कडू यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.



संचालक पदावरून काढल्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया


बच्चू कडू म्हणाले, आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात आले, हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमांकडूनच कळले. मला अपात्र ठरवले जाते आणि त्याची साधी नोटीसही आपल्याला दिली जात नाही, याचे आश्चर्य वाटते. आपल्यावरील ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली आहे.



राजकीय संबंध नाही- भाजप आमदार प्रवीण तायडे


बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय हा जिल्हा विभागीय सहनिबंधकांनी घेतळेला आहे. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. काँग्रेसच्या संचालकांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. हे जुने प्रकरण आहे. त्याचा बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणाशीही संबंध नाही, असे अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.