मोहन्यातील लहुजी नगरात हागणदार मुक्तीला हरताळ

  46

उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ


कल्याण : कल्याण, डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा गवागवा केला जात असला तरी मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वासियांना शौचालय सुविधा अभावी उघड्यावर प्रातर्विधी उरकावा लागत असल्याने शासनाच्या हागणदारी मुक्त अभियनाला मनपा क्षेत्रात हरताळ बसल्याचे दिसते.


मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वजा वसाहतीमध्ये दोन हजारहून अधिक नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर शौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कडोंमपाच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचा संभाव्य आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.


स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास नागरिक मजबूर आहेत. विशेषतः महिला वर्गाची यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. लहुजी नगर मधील पूर्वीच्या जुन्या शौचालयाची पडझड झाल्याने ते तोडण्यात आले. त्या जागी नवीन शौचालय बांधणे गरजेचे होते. परंतु शौचलय बांधण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, यापूर्वी सुलभ शौचालय दुमजली बांधण्याचे काम इमारत बांधून देखील न्यायालयीन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अद्याप देखील सुरू होऊ शकले नाही.


लहुजी नगर मधील करदाते नागरिक मनपाला मालमत्ता कर भरतात, त्यांच्या मुलभूत सुविधा पुरविणे मनपाचे काम आहे. कोणच्या दबावामुळे नागरी सोयी सुविधाचा बोजावारा होत आहे, असाही आरोप यानिमित्ताने होत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर