पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई : राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार १६ जून, २०२५ रोजी शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक २३, किसन नगर, ठाणे तसेच शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळा, आंध्रा हायस्कूल जवळ, वडाळा या शाळेत उपस्थित राहतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे भेट देतील.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, ता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय

आता महिनाभरात होणार जमीन मोजणी - राज्यात २०० 'खासगी भूमापकांची' नियुक्ती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल

आखाती देशांमध्ये अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेबाबत विधानपरिषदेत चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण

प्रवेशमार्गांवर घडणार मुंबईची ओळख

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक  संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली