एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

  79

मुंबई :परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करित आहेत.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय दिनांक ०६/१२/२०१६ पासून बंद करण्यात आले होते. परंतु परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना उचलून धरली. त्यामुळे आकार व प्रशासकीय दृष्ट्या कर्नाटक महामंडळाच्या दुप्पट असणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे देखील किमान ५ प्रादेशिक विभागात विभाजन करावे अशी संकल्पना त्यांनी मांडली.


नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी ५ प्रादेशिक विभागांची रचना


राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या धर्तीवर एसटीची यंत्रणा उभी आहे. तालुकास्तरावर आगार जिल्हास्तरावर विभागीय कार्यालय आणि राज्य स्तरावर मध्यवर्ती कार्यालय अशी त्रिस्तरीय रचना सध्या कार्यरत आहे. परंतु राज्य शासनाच्या महसूल विभागा प्रमाणे सहा प्रशासकीय विभागांचा या त्रिस्तरीय रचनेत समावेश नव्हता. त्यामुळे मध्यवर्ती कार्यातून थेट विभागीय कार्यालयाशी संवाद साधणे भौगोलिक दृष्ट्या शक्य होत नव्हते. अर्थात, स्थानिक पातळीवर वाहतुकीचे नियोजन करणे, यात्रा- जत्रा यासाठी जादा वाहतूक करणे असे निर्णय घेण्यासाठी विलंब होत असे, अथवा प्रशासकीय दिरंगाई मुळे त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या महसूलावर होत होता. या सर्वांची दखल घेऊन " नियंत्रण नियोजन आणि समन्वयाच्या " हेतूने महामंळातंर्गत ५ प्रादेशिक विभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Comments
Add Comment

गरिबांच्या हडप केलेल्या जागा त्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : गरिबांच्या जागा धाकदपट करून, जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून हडप केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन मुंबई : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात

भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविणार - उदय सामंत

मुंबई : राज्यात भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा श्वानांची नसबंदी करणे तसेच

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार

मुंबई :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक आणि टंकलेखक पदासाठी घेतलेल्या परीक्षेसंदर्भात

संजय गायकवाड यांच्यावर आमदार निवास कँन्टीनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५२

Eknath Shinde : उदय सामंत म्हणतात, 'मुख्यमंत्री व्हायला कुवत अन् धमक लागते', तर खासदार म्हस्के म्हणाले राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये... राऊतांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंच्या नेत्यांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुपचूप दिल्ली दौरा करून