कांदिवली : मालाड पश्चिमेला जन कल्याण नगर मुख्य मार्गांवरील पद पथावर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे. जनकल्याण नगरात असलेल्या नागरिकांसाठी जन कल्याण नगर मार्ग हा सर्वाधिक वापरात असलेला मुख्य अरुंद मार्ग आहे. यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यां मार्गाच्या पदपथावर अनधिकृत व्यावसायिक,भाज्या, फळे व इतर वस्तूंची विक्री करत आहेत. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना वाहतुकीच्या मार्गांवरूनच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पालिकेने अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
जन कल्याण नगरात उच्चंभ्रू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकांचा दैनंदिन व्यवहार जन कल्याण नगर मार्गांवर केला जातो. सदर मार्ग चारकोप ते मालाड मालवणी रस्त्याला जोडला गेल्याने यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मार्गाच्या पद पथा वर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडून, पद पथ गिळकृत केला आहे. तसेचं खरेदी करणारे नागरिक आपली वाहने, दुचाकी अनधिकृत विक्रेत्या समोरच उभी करत असल्याने, मार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांना आणि स्थानिकांना पद पथ सोडून,वाहतुकीच्या रस्त्यावरूनच तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागते, यामुळे लहान मोठे वाद, अपघात होतात. पालिकेने पद पथा वरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा जेणेकरून महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल, अशी मागणी स्थानिकांमध्ये केली जात आहे.