पदपथावरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे अपेक्षित

कांदिवली : मालाड पश्चिमेला जन कल्याण नगर मुख्य मार्गांवरील पद पथावर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे. जनकल्याण नगरात असलेल्या नागरिकांसाठी जन कल्याण नगर मार्ग हा सर्वाधिक वापरात असलेला मुख्य अरुंद मार्ग आहे. यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यां मार्गाच्या पदपथावर अनधिकृत व्यावसायिक,भाज्या, फळे व इतर वस्तूंची विक्री करत आहेत. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना वाहतुकीच्या मार्गांवरूनच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पालिकेने अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


जन कल्याण नगरात उच्चंभ्रू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकांचा दैनंदिन व्यवहार जन कल्याण नगर मार्गांवर केला जातो. सदर मार्ग चारकोप ते मालाड मालवणी रस्त्याला जोडला गेल्याने यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मार्गाच्या पद पथा वर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडून, पद पथ गिळकृत केला आहे. तसेचं खरेदी करणारे नागरिक आपली वाहने, दुचाकी अनधिकृत विक्रेत्या समोरच उभी करत असल्याने, मार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.


प्रवाशांना आणि स्थानिकांना पद पथ सोडून,वाहतुकीच्या रस्त्यावरूनच तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागते, यामुळे लहान मोठे वाद, अपघात होतात. पालिकेने पद पथा वरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा जेणेकरून महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल, अशी मागणी स्थानिकांमध्ये केली जात आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात