पदपथावरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे अपेक्षित

कांदिवली : मालाड पश्चिमेला जन कल्याण नगर मुख्य मार्गांवरील पद पथावर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे. जनकल्याण नगरात असलेल्या नागरिकांसाठी जन कल्याण नगर मार्ग हा सर्वाधिक वापरात असलेला मुख्य अरुंद मार्ग आहे. यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यां मार्गाच्या पदपथावर अनधिकृत व्यावसायिक,भाज्या, फळे व इतर वस्तूंची विक्री करत आहेत. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना वाहतुकीच्या मार्गांवरूनच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पालिकेने अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


जन कल्याण नगरात उच्चंभ्रू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकांचा दैनंदिन व्यवहार जन कल्याण नगर मार्गांवर केला जातो. सदर मार्ग चारकोप ते मालाड मालवणी रस्त्याला जोडला गेल्याने यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मार्गाच्या पद पथा वर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडून, पद पथ गिळकृत केला आहे. तसेचं खरेदी करणारे नागरिक आपली वाहने, दुचाकी अनधिकृत विक्रेत्या समोरच उभी करत असल्याने, मार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.


प्रवाशांना आणि स्थानिकांना पद पथ सोडून,वाहतुकीच्या रस्त्यावरूनच तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागते, यामुळे लहान मोठे वाद, अपघात होतात. पालिकेने पद पथा वरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा जेणेकरून महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल, अशी मागणी स्थानिकांमध्ये केली जात आहे.

Comments
Add Comment

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा