Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचे तुर्की कनेक्शन? जाणून घ्या सत्य

अपघातग्रस्त विमान टर्किश टेक्निकने देखभाल केला असल्याचा दावा खोटा


नवी दिल्ली: अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताशी तुर्कस्तानसोबत संबंध असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अपघातग्रस्त विमानाची देखभाल टर्किश टेक्निकअंतर्गत झाली असल्याचा दावा योग गुरु रामदेव बाबा यांनी आरोप केला आहे. मुळात हा दावा किती खरा आहे, आणि एअर इंडिया आणि टर्किश टेक्निक यामध्ये कोणता करार झाला होता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


एअर इंडिया विमान अपघातानंतर, तुर्की अधिकाऱ्यांनी तुर्की टेक्निकच्या देखभालीच्या दाव्याचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केले की एअर इंडियासोबतच्या त्यांच्या करारांमध्ये फक्त B777 विमानांचा समावेश होता.



अधिकाऱ्यांकडून दाव्याचे खंडन


अपघातग्रस्त एअर इंडिया बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या देखभालीशी तुर्की कंपनीचे नाव जोडले जात होते, परंतु आता तुर्कीने हे दावे नाकारले आहेत. सेंटर फॉर काउंटरिंग डिसइन्फॉर्मेशन ऑफ द कम्युनिकेशन डायरेक्टरेटने एका निवेदनात स्पष्ट केले की तुर्की टेक्निकने विमानाची देखभाल केल्याचा दावा खोटा आहे. विभागाने म्हटले आहे की, 'अपघातग्रस्त एअर इंडिया प्रवासी विमान 'बोईंग ७८७-८' तुर्की टेक्निकने देखभाल केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून, तुर्की आणि भारत संबंधांबद्दल जनमत प्रभावित करण्याच्या उद्देशाने ही चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे."


भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीशी संबंध बिघडले आहेत. तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, भारताविरुद्ध वापरलेली बहुतेक पाकिस्तानी शस्त्रे देखील तुर्कीमध्ये तयार केली जात होती. यानंतर, भारतात तुर्की वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात झाली आणि सरकारने काही कंपन्यांवर कठोर कारवाई देखील केली आहे. अशा परिस्थितीत, तुर्की पाकिस्तानवरील प्रेमाची किंमत चुकवत आहे आणि त्यांच्या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरशी तुर्कीचा कोणताही करार नाही 


'२०२४ आणि २०२५ मध्ये एअर इंडिया आणि टर्किश टेक्निक यांच्यात झालेल्या करारानुसार, केवळ बी७७७ प्रकारच्या वाइड-बॉडी विमानांसाठी देखभाल सेवा प्रदान केल्या जातात. अपघातात सहभागी असलेले बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या कराराच्या कक्षेत येत नाही. आजपर्यंत, टर्किश टेक्निकने अशा कोणत्याही एअर इंडिया विमानाची देखभाल केलेली नाही.'  



मृतदेहांची ओळख पटवणे कठीण


१२ जून रोजी गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे प्रवासी विमान काही मिनिटांतच खाली कोसळले.  जमिनीवर पडण्यापूर्वी, विमान विमानतळालगतच्या मेघानी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळले. या अपघातात विमानातील प्रवाशांव्यतिरिक्त वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला. एअर इंडियाच्या या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव व्यक्ती या अपघातात बचावले. विमानातील आग आणि उच्च तापमानामुळे बहुतेक मृतदेह गंभीरपणे जळाले आहेत, ज्यांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यामुळे डीएनए मॅचिंगद्वारे पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवले जात आहेत.



गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली


डीएनए मॅचिंगद्वारे आतापर्यंत ३३ मृतदेहांची ओळख पटली आहे, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेह देखील समाविष्ट आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जातील. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने घटनेच्या २८ तासांनंतर ब्लॅक बॉक्स शोधला आहे आणि या मोठ्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.