जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी, महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका

मुंबई : जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जो जगातील एकूण मत्स्यव्यवसाय उत्पादनापैकी सुमारे आठ उत्पादन एकट्या भारतामध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या मत्स्यव्यवसाय उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसाय उत्पादनाचे योगदान मोठे आहे. भारतीय मत्स्यव्यवसायाने २०२३ - २४ मध्ये ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन सागरी अन्न अर्थात सीफूड सीफूड निर्यात केले. ही वाढ मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा सर्वात मोठा पुरावा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्यव्यवसायाचे योगदान वाढवण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन २०२३ - २४ मध्ये ४,३४,५७४ मेट्रिक टन होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्याचे मत्स्योत्पादन २०२४ - २५ मध्ये २९,१८४ मेट्रिक टनांनी वाढले आणि ४,६३,७५८ मेट्रिक टनांवर पोहोचले.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा, १९८१ (सुधारणा-२०२१) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, ड्रोन देखरेखीसह, राज्यात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,