जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी, महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका

मुंबई : जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जो जगातील एकूण मत्स्यव्यवसाय उत्पादनापैकी सुमारे आठ उत्पादन एकट्या भारतामध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या मत्स्यव्यवसाय उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसाय उत्पादनाचे योगदान मोठे आहे. भारतीय मत्स्यव्यवसायाने २०२३ - २४ मध्ये ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन सागरी अन्न अर्थात सीफूड सीफूड निर्यात केले. ही वाढ मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा सर्वात मोठा पुरावा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्यव्यवसायाचे योगदान वाढवण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन २०२३ - २४ मध्ये ४,३४,५७४ मेट्रिक टन होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्याचे मत्स्योत्पादन २०२४ - २५ मध्ये २९,१८४ मेट्रिक टनांनी वाढले आणि ४,६३,७५८ मेट्रिक टनांवर पोहोचले.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा, १९८१ (सुधारणा-२०२१) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, ड्रोन देखरेखीसह, राज्यात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

पर्यटन क्षेत्रात जगभरात ९ कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती ?

दिल्ली(वृत्तसंस्था): पुढील १० वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्र ९ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण

नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा

नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या