जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी, महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका

मुंबई : जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जो जगातील एकूण मत्स्यव्यवसाय उत्पादनापैकी सुमारे आठ उत्पादन एकट्या भारतामध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या मत्स्यव्यवसाय उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसाय उत्पादनाचे योगदान मोठे आहे. भारतीय मत्स्यव्यवसायाने २०२३ - २४ मध्ये ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन सागरी अन्न अर्थात सीफूड सीफूड निर्यात केले. ही वाढ मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा सर्वात मोठा पुरावा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्यव्यवसायाचे योगदान वाढवण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन २०२३ - २४ मध्ये ४,३४,५७४ मेट्रिक टन होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्याचे मत्स्योत्पादन २०२४ - २५ मध्ये २९,१८४ मेट्रिक टनांनी वाढले आणि ४,६३,७५८ मेट्रिक टनांवर पोहोचले.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा, १९८१ (सुधारणा-२०२१) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, ड्रोन देखरेखीसह, राज्यात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर