प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

  45

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर कॉपी प्रकरण; चौकशीत ३२ विद्यार्थी निलंबित


यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात जवळा येथील स्व. भारतसिंह ठाकूर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर परीक्षा काळात कॉपी प्रकरण उघडकीस आले आहे. नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकून परीक्षा केंद्रात ३२ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडले. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


ही धाड ४ आणि ५ जून रोजी टाकण्यात आली. ८ ते १० अधिकार्‍यांच्या पथकाने केंद्रातील विविध कक्षांची कसून झडती घेतली. सुरुवातीला ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र महाविद्यालयाचे संचालक अ. भा. ठाकूर यांनी प्रत्यक्षात ३२ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचे स्पष्ट केले आहे.



या केंद्रात सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, १७ जूनपर्यंत परीक्षा सुरू आहेत. कॉपीचे प्रकार सलग दोन दिवस आढळल्यामुळे पथकाने दिवसभर थांबून परीक्षेवर थेट देखरेख केली.


विद्यार्थ्यांकडून कॉपीचे प्रकार सर्रास होतात, त्याला पूर्णपणे रोखणे कठीण असल्याची कबुली संचालकांनी दिली आहे. यामुळे मुक्त विद्यापीठाच्या केंद्रांमधील परीक्षा व्यवस्थेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


“प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा” अशी चुकीची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये बळावते आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे इतर केंद्रांवरही अशा प्रकारची तपासणी व्हावी, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.

Comments
Add Comment

राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट

मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने

हिंदवी पाटीलला अश्रू अनावर; सह्याद्री अमृततुल्यावर PMC ची कारवाई!

पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण काहीसे दुःखद आहे.

Palki Sohala : देहू-आळंदीत वारीच्या सोहळ्याची लगबग सुरु!

बुधवारी तुकोबा, गुरुवारी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते

Ajit Pawar : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार

पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी

Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता