प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर कॉपी प्रकरण; चौकशीत ३२ विद्यार्थी निलंबित


यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात जवळा येथील स्व. भारतसिंह ठाकूर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर परीक्षा काळात कॉपी प्रकरण उघडकीस आले आहे. नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकून परीक्षा केंद्रात ३२ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडले. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


ही धाड ४ आणि ५ जून रोजी टाकण्यात आली. ८ ते १० अधिकार्‍यांच्या पथकाने केंद्रातील विविध कक्षांची कसून झडती घेतली. सुरुवातीला ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र महाविद्यालयाचे संचालक अ. भा. ठाकूर यांनी प्रत्यक्षात ३२ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचे स्पष्ट केले आहे.



या केंद्रात सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, १७ जूनपर्यंत परीक्षा सुरू आहेत. कॉपीचे प्रकार सलग दोन दिवस आढळल्यामुळे पथकाने दिवसभर थांबून परीक्षेवर थेट देखरेख केली.


विद्यार्थ्यांकडून कॉपीचे प्रकार सर्रास होतात, त्याला पूर्णपणे रोखणे कठीण असल्याची कबुली संचालकांनी दिली आहे. यामुळे मुक्त विद्यापीठाच्या केंद्रांमधील परीक्षा व्यवस्थेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


“प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा” अशी चुकीची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये बळावते आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे इतर केंद्रांवरही अशा प्रकारची तपासणी व्हावी, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध