रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात ३७ वर्षांनंतर पुराचे पाणी शिरले आहे. तालुक्यातील भालावली, धाऊलवल्ली, कोतापूर, नवेदर परिसराला पावसाचा तडाखा बसला असून घरांमध्ये पाणी शिरले, तर रस्ते आणि पुलांची दुर्दशा झाली आहे.




तब्बल ३७ वर्षांनी पुराचे पाणी


जिल्ह्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पडलेल्या पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला चांगलाच दणका दिला. या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने सहा फुटांपर्यंत धडक मारली होती. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली देवी मंदिर परिसरात पाणी शिरले होते. तब्बल ३७ वर्षांनंतर ही पूरपरिस्थिती निर्माण झाली. भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील वहाळावरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. राजवाडी वाडा भराडे येथील रस्त्यावर दरड कोसळली. भालवली परिसरात काही घरांमध्ये नदीला आलेल्या पुरांचे पाणी शिरले होते. काही घरांमध्ये सुमारे चार ते पाच फूट पाणी शिरले.



अनेक घरे, मंदिरांचं नुकसान


भालावली गिरवणेवाडी येथे दरड कोसळून गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. मोगरे सडेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. नवेदर येथील दिनेश पांचाळ यांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. भालावली येथे अनेक घरे, मंदिर तसेच सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. भालावली येथील मिलिंद आडविरकर यांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तिवरे येथे मधुकर गावकर यांच्या घरालगत दरड कोसळुन नुकसान झाले आहे. धाऊलवल्ली ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले आहे. कोतापूर गावात कोतापूर वड ते एकवीरा देवी मंदिर या मार्गावरील नुकत्याच झालेल्या डांबरी रस्त्याची अवस्था या पावसाने अक्षरशः दयनीय झाली आहे.


पावसाच्या जोरदार प्रवाहाने रस्त्याचे डांबर उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे आणि खाचखळगे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गावातील कही घरांच्या अंगणात आणि काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये पाणी शिरले. त्यामुळे गॅरेजमधील सामानाचे नुकसान झाले आहे. संतोष नवरे, गौरव नवरे, विवेक प्रभुघाटे, अरुण दीक्षित, विनायक प्रभुघाटे आणि वैभव नवरे यांनी गॅरेजमधील सामान बाजूला हलवण्यासाठी मदत केली.


कोतापूर लक्ष्मी केशव मंदिराखालील करप्याच्या आगरातील एक नंबर शाळेपर्यंत जाणारा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, गावकऱ्यांना, शाळेतल्या मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. ओंकार प्रभुघाटे यांच्या गारगेश्वर मंदिरासमोरील आगराचा संपूर्ण गडगा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे शेती आणि परिसरातील जमिनींचेही नुकसान झाले आहे. गंगाराम जाधव यांच्या काजू फॅक्टरीजवळील विहिरीसमोरील कुंपण मोठ्या प्रमाणात कोसळले आहे.


आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११९.८७ मि. मी. पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तहसीलदार विकास गंबरे यांनी गाव व वाडीवस्तीवरील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात ७७.५५ मिमी, लांज्यात ५८.६० मिमी, संगमेश्वरमध्ये ५१.९१ मिमी, खेडमध्ये ४८.५७ मिमी, दापोलीत ४७.५७ मिमी, मंडणगडमध्ये ३१.७५ मिमी, चिपळूणमध्ये २५.५६ मिमी, तर गुहागरमध्ये २२.८० मिमी पावसाची नोंद झाली.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.