एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल


चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.




संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि काय नाही याचा नेम नाही. अलिकडेच पुण्यातील एका प्रसिद्ध नाट्यगृहाचे उंदीर प्रकरण ताजे असताना, आता  छत्रपती संभाजीनगरामधून एक विश्वास न बसणारी बातमी समोर आली आहे. चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.


एका उंदरामुळे संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 9 तास खंडित झाला होता. त्यामुळे पाणी न मिळाल्याने गुरूवारी रहिवाशांचे मोठे हाल झाले. जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृह येथील पंपगृहात उंदीर शिरल्यामुळे दोन्ही फेस एकत्र होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तास बंद होता. परिणामी अनेक भागात आज पाणी मिळू शकले नाही. शनिवारी देखील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


नवीन फारोळा पंपगृह येथील इन्कमर 2 मध्ये स्पार्क होऊन पहाटे 4:25 वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर सर्व इन्कमर पॅनलची तपासणी केली असता इन्कमर 2 मध्ये उंदीर शिरल्यामुळे फेस टू फेस होऊन पंपिंग ट्रिप झाली झाल्याचे आढळून आले. उंदीर पॅनल बाहेर काढून ट्रायल घेते वेळेस सबस्टेशन मधील सप्लाय स्टँड होत नसल्याने ट्रान्सफॉर्मर चेकिंग काम करण्यासाठी तब्बल 9 तास लागले, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद असल्यामुळे आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही तर उद्याच्या पाणीपुरवठ्यावर देखील मोठा परिणाम होणार आहे.


महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील काही महिन्यांपूर्वी एका सापामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. डीपीमध्ये साप गेल्याने यंत्रणेत बिघाड झाला  होता आणि त्याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला होता. वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध