पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने आळंदी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये सर्व चौकांत पोलीस मदत केंद्र कार्यरत केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बेवारसपणे ठेवल्या जाणाऱ्या संशयास्पद वस्तूंवर तसेच चोरांवर नजर ठेवण्यासाठी सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. वारी काळात मंगळवार (दि. १७) ते शुक्रवार (दि. २०) स्थानिक नोकरदार आणि भाविक दिंडीकऱ्यांच्या वाहना व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या वाहनांना आळंदीत प्रवेश करण्यास मज्जाव केल्याची माहिती यावेळी आळंदी पोलीस प्रशासनाने दिली.

आळंदी शहरात सध्या भोसरी, मरकळ, चाकण, महाळुंगे, रांजणगाव औद्योगिक भागात ये-जा करणाऱ्या कंपन्या तसेच कामगारांच्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहनेही आता सुरू झाली आहेत. यामुळे नियोजनाचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी आणि त्यांच्या सहकारी अधिकारी यांनी आळंदीतील इंद्रायणी परिसर, देऊळ वाड्यास भेटी दिल्या.



आळंदीत वाहनतळ अपुरे असल्याने रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी केली जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत त्यांनी त्यांच्याकडील वाहने धर्मशाळेत उभी करावीत. दिंड्यांची वाहने प्रस्थान काळात आळंदीत वाहनपास पाहून सोडण्यात येतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांना गुलाबी रंगाचा, तर दिंड्यांच्या वाहनांना पिवळ्या रंगाचा पास देण्यात येणार आहे.

...असा असेल बंदोबस्त


वारीसाठी यंदाच्या वर्षी सात सहायक पोलीस आयुक्त, ४२ पोलीस निरीक्षक, १६४ पोलीस उपनिरीक्षक, १३४० पोलीस अंमलदार, ६०० होमगार्डस, एनडीआरएफची एक तुकडी, बीडीडीएसच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी नेमल्या आहेत.
Comments
Add Comment

'हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही': उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा

३२ हजार कोटींच्या मदतीने विरोधकांचे राजकारण हाणून पाडले; 'मुंबई मनपासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा' छत्रपती

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा मिरज (सांगली):

भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)

फडणवीसांकडून योगेश कदमांची पाठराखण! 'परवाना दिलाच नाही, तर आरोप कशाला?'

नाशिक : पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना (बंदुकीचा परवाना) देण्याच्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार