Ahmedabad Plane Crash : पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये, केली अपघातस्थळाची पाहणी तसेच जखमींची विचारपूस आणि मृतांच्या नातलगांचे सांत्वन

अहमदाबाद : एअर इंडिया कंपनीचे AI 171 अहमदाबाद - लंडन हे बोईंग ७८७ - ८ ड्रीमलायनर विमान गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात कोसळले. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यापासून पंतप्रधान सतत मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. आज म्हणजेच शुक्रवार १३ जून रोजी पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी अपघातातील जखमींची विचारपूस केली तसेच मृतांच्या नातलगांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अपघातस्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.





ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानात 11 A या सीटवर बसलेला भारतीय वंशाचा इंग्रज नागरिक रमेश विश्वासकुमार आश्चर्यकारकरित्या वाचला. छाती, डोळे आणि पायांना थोड्या दुखापती झाल्या असल्या तरी रमेश सुरक्षित आहे. सध्या रमेश अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. पंतप्रधान मोदींनी रमेश यांची भेट घेतली.

हाती आलेल्या माहितीनुसार, विमानातील २४१ जणांचा आणि ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथे काही नागरिकांचा मृत्यू झाला. उड्डाण केल्यानंतर विमान काही सेकंदांतच विमानतळाजवळच्या मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चहूबाजूने धुराचे लोट येऊ लागले. आतापर्यंत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहमदाबाद पोलसांनी सांगितले. मृतांमध्ये मेडिकल हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार विमानातील एकूण २४२ प्रवाशांमध्ये, १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या शिवाय १२ क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहितीनुसार यामध्ये २ नवजात बाळ, ११ लहान मुले, २१७ प्रौढ प्रवासी प्रवास करत होते.

अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्राचे सात जण होते. यात चार केबिन क्रू आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अपर्णा महाडिक (खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल यांची पत्नी आहेत.) महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि शनी सोंघरे. याशिवाय, राजस्थानमधील पाच प्रवाशांचाही या अपघातात मृत्यू झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले.
Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व