साई मंदिरात आता हार-फुले नेता येणार

तदर्थ समितीचा निर्णय


शिर्डी : काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या साईनगरीत साईभक्तांना साई समाधी मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती मात्र गुरुवारी १२ जून रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुल, हार व प्रसाद बंदीचा निर्णय घेतला असून भाविकांची लूट थांबवण्याकरिता पूजेचे साहित्य खरेदी केल्याची पावती प्रवेश द्वारा जवळ दाखवल्यानंतरच साई भक्तांना फुल हार प्रसाद नेण्यास मंदिरात परवानगी मिळणार असल्याने या निर्णयाचे साई भक्त व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कोरोना काळात साई मंदिरात फुल हार व प्रसाद बंदी केल्यानंतर दोन ते तीन वर्ष शिर्डीतील फुल विक्रेते व परिसरातील फुल उत्पादक यांना आर्थिक वर्षाचा मोठा सामना करावा लागला होता.


हार- फुल व प्रसाद बंदी उठवण्याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांनी न्यायालयीन लढा उभारून साई मंदिरात फुल हार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवून फुल उत्पादक शेतकरी व फुल विक्रेते यांना मोठा आधार दिला होता. शिर्डीतील काही दुकानदार फुल हार व प्रसाद याची किमतीपेक्षा जादा दराने विक्री करून भाविकांची लूट करीत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर शिर्डीत ग्रामस्थांनी या दुकानदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला तसेच भाविकांची होणारी लूट थांबण्याकरिता डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील व्यवसायिकांची बैठक घेऊन त्यांना दुकानासमोर दर फरक लावण्याच्या सूचना केल्या होत्या.


याबाबत नगरपरिषदेला देखील सदर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. फुलहार प्रसाद अनेक वर्षानंतर सुरू होताच काही महिन्यातच काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बंदुकीच्या साह्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते.काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या विविध देश व राज्यातून भाविकांची सुरक्षाची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने साई मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास बंदी केली होती त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या पुन्हा खचला होता.


तसेच शिर्डीतील छोटे व्यवसायिक देखील फुल हार प्रसाद बंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडले होते.साई मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता.अखेर गुरुवारी १२ जून रोजी साईबाबा संस्थानच्या तथर्थ समितीने फुल हार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवण्याचा निर्णय घेऊन भाविकांची पूजेच्या साहित्यापासून होणारी लूट थांबवण्याकरिता साई मंदिरात भाविकांना पूजेचे साहित्य घेऊन जाण्यापूर्वी ज्या दुकानात पूजेचे साहित्य खरेदी केले त्या दुकानचे पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे बिल मंदिर प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच साई समाधी मंदिरात त्या भाविकाला फुल हार व प्रसाद नेण्यास प्रवेश दिला जाईल असा निर्णय घेतल्याने साई भक्तांकडून जादा दराने पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना या निर्णयाने चाप बसणार असून या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. साई संस्थांनी प्रथमच इतिहासात हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे भाविकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे