संगमनेरात दहशत व लुटमार करणाऱ्या टोळ्या जेरबंद

१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त


संगमनेर : संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात नागरिकांना मारहाण करुन लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लुटमार करणाऱ्या २ टोळ्या जेरबंद केल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार १५० रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईचे संगमनेरकरांनी कौतुक केले आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची काही गुंड प्रवृत्तीचे इसम दिवसा ढवळ्या लुटमार करत होते. ह्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली होती. अखेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक केली आणि त्यांनी साई शरद सुर्यवंशी (वय २० वर्षे), राहुल भरत सोनवणे (वय २४ वर्षे), आदित्य संपत सुर्यवंशी (वय २७ वर्षे, तिघे रा. अकोले नाका, संगमनेर ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर), पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर (वय २७ वर्षे रा पंपिंग स्टेशन, ता संगमनेर, जि. अहिल्यानगर), सिध्दार्थ दीपक मावस (वय २२ वर्षे, रा.अरगडे गल्ली,खांडगाव,ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर), प्रशांत उर्फ परशा दिपक मावस (वय १९ वर्षे, रा अरगडे गल्ली, खांडगाव, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), सौरभ पप्पु खर्डे वय १९ वर्षे, रा गणेशवाडी, खांडगाव, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) या सात जणांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा असे विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या उघडकीस आले आहे. यामध्ये त्यांच्या कडून दरोडा टाकुन व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


यामध्ये १० हजार रुपये किंमतीचे चांदीचे मुख व पाठीमागुन पितळी मुलामा असलेले देव चार नग,४ हजार रुपये किंमतीचे पितळी दिवटे, तम्हन, तांब्या, ताट असे पुजेचे साहित्य,एक चाकू, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ६५० रोख रक्कम, १५०० रुपयांच्या नोटा, एक चॉपर व चार काठ्या असा एकूण १ लाख ५५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, संदिप शिरसाठ, अजित कुऱ्हे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, अतुल उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी केली आहे. दरम्यान पोलीस पथकाने केलेल्या या धडक कारवाईचे संगमनेरकरांनी कौतुक केले असून यामुळे आता अकोले नाका व परिसरात होणाऱ्या लूटमारीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे.

Comments
Add Comment

Buldhana News : हृदयद्रावक! लेकीचं कन्यादान करतानाच बापाने सोडले प्राण; बुलढाण्यात लग्नमंडपातच हळहळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात एका मंगलमय प्रसंगाचे रूपांतर क्षणातच एका

Pune News : पुण्यात खळबळ! 'त्या' ६ तासांचं गूढ काय? १०० सीसीटीव्ही तपासूनही पुण्यातील बॉम्ब प्रकरणाचा सूत्रधार मोकाटच!

पुणे : पुण्याच्या हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात आयईडी (IED) स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात

Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी

State gov issues regulations for fuel saving :वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस बस-मेट्रोने प्रवास, इंधन बचतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने

HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड मुंबई : राज्यातील वाहन

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव