संगमनेरात दहशत व लुटमार करणाऱ्या टोळ्या जेरबंद

  26

१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त


संगमनेर : संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात नागरिकांना मारहाण करुन लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लुटमार करणाऱ्या २ टोळ्या जेरबंद केल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार १५० रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईचे संगमनेरकरांनी कौतुक केले आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची काही गुंड प्रवृत्तीचे इसम दिवसा ढवळ्या लुटमार करत होते. ह्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली होती. अखेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक केली आणि त्यांनी साई शरद सुर्यवंशी (वय २० वर्षे), राहुल भरत सोनवणे (वय २४ वर्षे), आदित्य संपत सुर्यवंशी (वय २७ वर्षे, तिघे रा. अकोले नाका, संगमनेर ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर), पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर (वय २७ वर्षे रा पंपिंग स्टेशन, ता संगमनेर, जि. अहिल्यानगर), सिध्दार्थ दीपक मावस (वय २२ वर्षे, रा.अरगडे गल्ली,खांडगाव,ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर), प्रशांत उर्फ परशा दिपक मावस (वय १९ वर्षे, रा अरगडे गल्ली, खांडगाव, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), सौरभ पप्पु खर्डे वय १९ वर्षे, रा गणेशवाडी, खांडगाव, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) या सात जणांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा असे विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या उघडकीस आले आहे. यामध्ये त्यांच्या कडून दरोडा टाकुन व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


यामध्ये १० हजार रुपये किंमतीचे चांदीचे मुख व पाठीमागुन पितळी मुलामा असलेले देव चार नग,४ हजार रुपये किंमतीचे पितळी दिवटे, तम्हन, तांब्या, ताट असे पुजेचे साहित्य,एक चाकू, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ६५० रोख रक्कम, १५०० रुपयांच्या नोटा, एक चॉपर व चार काठ्या असा एकूण १ लाख ५५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, संदिप शिरसाठ, अजित कुऱ्हे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, अतुल उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी केली आहे. दरम्यान पोलीस पथकाने केलेल्या या धडक कारवाईचे संगमनेरकरांनी कौतुक केले असून यामुळे आता अकोले नाका व परिसरात होणाऱ्या लूटमारीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे.

Comments
Add Comment

Palki Sohala : देहू-आळंदीत वारीच्या सोहळ्याची लगबग सुरु!

बुधवारी तुकोबा, गुरुवारी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते

Ajit Pawar : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार

पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी

Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या

Monsoon Update: महाराष्ट्रात आज रेड अलर्ट, पुणे-ठाणे आणि सातारासह ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार

महाराष्ट्रात पाऊस परतला, मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार पुणे: महाराष्ट्रात आज दिवसभर वेगवेगळ्या जिल्ह्यात

एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल

चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता. संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि

‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई : पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. १६ जून रोजी तर विदर्भात सोमवार