‘तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निणर्य घेणार'

  31

मुंबई : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या सदस्यांना विविध बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. याचबरोबर बैठकीच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागामार्फत विश्रामगृहामध्ये निवासाची सोय करण्यात येईल तसेच मुंबईमध्ये कार्यालयासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची पहिली बैठक मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. तृतीयपंथीयांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस आमदार सर्वश्री बालाजी किणीकर, आनंद बोंढारकर, अमोल मिटकरी (ऑनलाईन), विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. सान्वी जेठवानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Comments
Add Comment

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ६,७३१ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर

लवकर सदनिका प्रकल्पबाधितांना सुपूर्द करण्याचे निर्देश मुंबई  : प्रकल्पबाधित कुटुंबांच्या निवासासाठी मुंबई

पश्चिम रेल्वे अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-दिल्ली दरम्यान चालवणार विशेष ट्रेन

मुंबई :पश्चिम रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-दिल्ली जं. दरम्यान अतिजलद

मध्य रेल्वेच्या गाड्यांना सुधारित डब्यांची रचना

मुंबई : मध्य रेल्वे काही गाड्यांच्या सेवा सुधारित संरचनेसह चालवणार आहे. ट्रेन क्रमांक १२२२३/१२२२४ लोकमान्य टिळक

कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा

म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध;म्हाडाला ४४००० चौ.मी.क्षेत्र उपलब्ध ८००१ रहिवासी, ८०० जमीन : मालकांचे होणार

डोंगरावरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे!

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा मुंबई : मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा मुंबई :