हैदराबाद : चित्रपटाच्या सेटवर पाण्याची टाकी फुटून अनेक जखमी

हैदराबाद : हैदराबादच्या शमशाबादजवळ राम चरण निर्मित आगामी 'द इंडिया हाऊस' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीन शूट करताना सेटवरील मोठी पाण्याची टाकी अचानक फुटल्याने सेटवर पूरासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सेट अस्ताव्यस्त झाला. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले.





'द इंडिया हाऊस' सिनेमाच्या सेटवर अचानक ओढवलेल्या या अपघातामुळे अनेक क्रू मेंबर्स जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, एक असिस्टंट कॅमेरा मॅन या दुर्घटनेत गंभीर जखम झाला. याशिवाय इतरांनाही किरकोळ जखमा झाल्या. सोशल मीडियावर टाकी फुटलेल्या क्षणांचे दृष्य व्हायरल झाले असून चित्रपटाचे इतर सेट्स आणि उपकरणं सुद्धा यामुळे खराब झाली आहेत. या दुर्घटनेच्या वेळेस सिनेमाचे मुख्य अभिनेते निखिल सिद्धार्थ आणि निर्माता-कलाकार राम चरण उपस्थित होते की नाही, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


दरम्यान, या अपघातामुळे सिनेमाचं शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले असून सध्या सुरक्षित उपाययोजना आणि जखमींच्या उपचारावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. 'द इंडिया हाऊस' हा सिनेमा १९०५ च्या काळातील क्रांतिकारक चळवळीवर आधारित असून, निखिल सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत आहेत. अनुपम खेर, सई मांजरेकर आणि दिग्दर्शक राम वाम्सी कृष्णा यांचा सहभाग असल्याने या सिनेमाविषयी रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. तथापि, या दुर्घटनेचा पोलीस तपास करत असून सध्या शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील