सुरक्षिततेसाठी असणारे बेरिकेट्स ठरताहेत धोकादायक

  47

वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी


कांदिवली  : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच सुशोभीकरण केलेल्या सिग्नल चौकात पडलेल्या बॅरिकेट्समुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. अस्तव्यस्त पडलेल्या बेरिकेट्सकडे ठेकेदार, पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. अपघात झाल्यानंतर जाग येणार का? असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.


कांदिवलीत रस्त्याच्या कामाला पूर्ण विराम मिळाला आहे. अंतिम तारीख उलटल्याने ठेकेदारांनी तकलादू पद्धतीने रस्त्याची कामे पूर्ण केली. कांदिवली गावठाण मार्गांवर सुरक्षिततेसाठी कामात वापरलेले बेरिकेट्स कर्मचाऱ्यांनी जागेवर टाकले आहेत. सदर मुख्य मार्ग अरुंद असल्याने, मार्गांवर काळोख असतो, अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद या मुख्य मार्गांवर, प्रचंड वाहतूक असते. या मार्गांवर बेरिकेट्सचे पाय तुटल्याने कित्येक दिवस रस्त्यावर तसाच आहे. मुंबई पोलीस नाका बंदीला याच बेरिकेट्सचा वापर करतात.


सिग्नल चौकात किलाचंद मार्गाकडे जाणाऱ्या पद पथाच्या लोखंडी ग्रील्सवर तुटलेले बेरिकेट्स मार्ग फलकासमोर अडकविण्यात आले आहे. यामुळे पदपथावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. जीवनदास मटानी चौकात सिग्नल जवळ तुटलेले बेरिकेट्स कित्येक दिवसांपासून पडून आहे. सिग्नल लागताच थांबणाऱ्या वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत. मुख्य मार्गांवरील बेरिकेट्ससाठी योग्य उपाययोजना करून आम्हाला दिलासा द्यावा, अपघात मुक्त मार्ग निर्माण करावा अशी मागणी वाहन चालकांसह प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले