Ahmedabad plane crash: मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एक हजाराहून अधिक DNA टेस्ट होणार - अमित शाह

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान क्रॅश झाले. या दुख:द घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले भारत सरकार आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्रितपणे बचावकार्यात सहभागी आहेत. या विमानात एकूण देश आणि विदेशातील २४२ जण होते. यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. यात एका प्रवाशाचा जीव बचावल्याची माहिती मिळाली आहे. मी त्याला भेटून आलो आहे. मृत्यूचा आकडा डीएनए टेस्ट आणि ओळख पटल्यानंतर अधिकृतपणे जाहीर केला जाईल. गुजरात सरकारने सर्व विभागांना अलर्ट केले आहे. सर्वांनी एकत्रित मिळून बचाव कार्य चालू केले आहे.


अमित शाह म्हणाले, सव्वा लाख लीटर इंधन विमानात होते. उष्णता आणि तापमान खूप जास्त होोते. कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळीही जाऊन आलो. सर्वांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांचे जितके नातेवाईक येथे पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेतले जाणार आहे. साधारण १ हजाराहून अधिक डीएनए टेस्ट कराव्या लागतील आणि या सर्व टेस्ट गुजरातमध्येच होतील. डीएनए सँपल घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले जातील.


केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, एव्हिएशन डिपार्टमेंटने तपास वेगात सुरू केला आहे. याचा तपास वेगाने झाला पाहिजे असे आदेश मंत्र्‍यांना देण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. हा एक अपघात होता. अपघाताला कोणी रोखू शकत नाही. मी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करतो.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,