Ahmedabad plane crash: मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एक हजाराहून अधिक DNA टेस्ट होणार - अमित शाह

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान क्रॅश झाले. या दुख:द घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले भारत सरकार आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्रितपणे बचावकार्यात सहभागी आहेत. या विमानात एकूण देश आणि विदेशातील २४२ जण होते. यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. यात एका प्रवाशाचा जीव बचावल्याची माहिती मिळाली आहे. मी त्याला भेटून आलो आहे. मृत्यूचा आकडा डीएनए टेस्ट आणि ओळख पटल्यानंतर अधिकृतपणे जाहीर केला जाईल. गुजरात सरकारने सर्व विभागांना अलर्ट केले आहे. सर्वांनी एकत्रित मिळून बचाव कार्य चालू केले आहे.


अमित शाह म्हणाले, सव्वा लाख लीटर इंधन विमानात होते. उष्णता आणि तापमान खूप जास्त होोते. कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळीही जाऊन आलो. सर्वांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांचे जितके नातेवाईक येथे पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेतले जाणार आहे. साधारण १ हजाराहून अधिक डीएनए टेस्ट कराव्या लागतील आणि या सर्व टेस्ट गुजरातमध्येच होतील. डीएनए सँपल घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले जातील.


केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, एव्हिएशन डिपार्टमेंटने तपास वेगात सुरू केला आहे. याचा तपास वेगाने झाला पाहिजे असे आदेश मंत्र्‍यांना देण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. हा एक अपघात होता. अपघाताला कोणी रोखू शकत नाही. मी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करतो.

Comments
Add Comment

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख