Ahmedabad plane crash: मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एक हजाराहून अधिक DNA टेस्ट होणार - अमित शाह

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान क्रॅश झाले. या दुख:द घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले भारत सरकार आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्रितपणे बचावकार्यात सहभागी आहेत. या विमानात एकूण देश आणि विदेशातील २४२ जण होते. यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. यात एका प्रवाशाचा जीव बचावल्याची माहिती मिळाली आहे. मी त्याला भेटून आलो आहे. मृत्यूचा आकडा डीएनए टेस्ट आणि ओळख पटल्यानंतर अधिकृतपणे जाहीर केला जाईल. गुजरात सरकारने सर्व विभागांना अलर्ट केले आहे. सर्वांनी एकत्रित मिळून बचाव कार्य चालू केले आहे.


अमित शाह म्हणाले, सव्वा लाख लीटर इंधन विमानात होते. उष्णता आणि तापमान खूप जास्त होोते. कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळीही जाऊन आलो. सर्वांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांचे जितके नातेवाईक येथे पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेतले जाणार आहे. साधारण १ हजाराहून अधिक डीएनए टेस्ट कराव्या लागतील आणि या सर्व टेस्ट गुजरातमध्येच होतील. डीएनए सँपल घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले जातील.


केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, एव्हिएशन डिपार्टमेंटने तपास वेगात सुरू केला आहे. याचा तपास वेगाने झाला पाहिजे असे आदेश मंत्र्‍यांना देण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. हा एक अपघात होता. अपघाताला कोणी रोखू शकत नाही. मी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करतो.

Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री