बदलापुरात २५० रोपांचे वाटप करून वटपौर्णिमा साजरी

  43

मागील आठ वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेनेने राबवला स्तुत्य उपक्रम


बदलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या सुवर्ण सतीश साटपे यांच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना २५० रोपांचे वाटप करून वडाची पूजा करण्यात आली. शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक ७ च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मागील आठ वर्षे प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी विभागातील शिवशांती कॉम्प्लेक्स व भवानीशंकर बिल्डिंगजवळ येतात. या ठिकाणी आलेल्या महिलांना मागील आठ वर्षांपासून सातत्याने एक रोप वितरित केले जाते. मागील वर्षी या महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. तुळस ही पूर्ण वेळ ऑक्सिजन देणारे झाड असून महिला दररोज तुळशीच्या झाडाची पूजा करतात यावर्षी आपण चार विविध प्रकारची रोपे आणून त्यांचे या महिलांना वाटप केले आहे.


यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट, तुळस व फायकस तसेच रिबीन ग्लास या इनडोअर व आउटडोर शोभेच्या रोपांचे वाटप करण्यात आले. काही रोपे ही शोभेची असून ती घराच्या आत मध्ये किंवा घराच्या बाहेर या दोन्ही ठिकाणी ठेवता येऊ शकतात. यापूर्वी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते कारण वटपौर्णिमेनिमित्ताने महिला बाजारातून वडाची तोडलेली फांदी घेऊन येतात व त्याची पूजा करतात. याचा बोध घेऊन आपण वडाच्या रोपाचे वाटप केले होते ज्यामुळे महिलांनी त्या रोपाचे घरी संगोपन करून पुढच्या वर्षी त्याचीच पूजा करावी हा या मागचा हेतू असतो.


यावेळी विभागातील महिलांनी मागील वर्षी वाटप केलेल्या झाडाच्या आठवणी सांगितल्या. त्या झाडाला आमच्या बाल्कनीत, आमच्या घरात कुंडीमध्ये लावले आहे आणि त्याची जोपासनाकरीत आहोत अशा आठवणी यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगितल्या.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर