बदलापुरात २५० रोपांचे वाटप करून वटपौर्णिमा साजरी

मागील आठ वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेनेने राबवला स्तुत्य उपक्रम


बदलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या सुवर्ण सतीश साटपे यांच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना २५० रोपांचे वाटप करून वडाची पूजा करण्यात आली. शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक ७ च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मागील आठ वर्षे प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी विभागातील शिवशांती कॉम्प्लेक्स व भवानीशंकर बिल्डिंगजवळ येतात. या ठिकाणी आलेल्या महिलांना मागील आठ वर्षांपासून सातत्याने एक रोप वितरित केले जाते. मागील वर्षी या महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. तुळस ही पूर्ण वेळ ऑक्सिजन देणारे झाड असून महिला दररोज तुळशीच्या झाडाची पूजा करतात यावर्षी आपण चार विविध प्रकारची रोपे आणून त्यांचे या महिलांना वाटप केले आहे.


यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट, तुळस व फायकस तसेच रिबीन ग्लास या इनडोअर व आउटडोर शोभेच्या रोपांचे वाटप करण्यात आले. काही रोपे ही शोभेची असून ती घराच्या आत मध्ये किंवा घराच्या बाहेर या दोन्ही ठिकाणी ठेवता येऊ शकतात. यापूर्वी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते कारण वटपौर्णिमेनिमित्ताने महिला बाजारातून वडाची तोडलेली फांदी घेऊन येतात व त्याची पूजा करतात. याचा बोध घेऊन आपण वडाच्या रोपाचे वाटप केले होते ज्यामुळे महिलांनी त्या रोपाचे घरी संगोपन करून पुढच्या वर्षी त्याचीच पूजा करावी हा या मागचा हेतू असतो.


यावेळी विभागातील महिलांनी मागील वर्षी वाटप केलेल्या झाडाच्या आठवणी सांगितल्या. त्या झाडाला आमच्या बाल्कनीत, आमच्या घरात कुंडीमध्ये लावले आहे आणि त्याची जोपासनाकरीत आहोत अशा आठवणी यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगितल्या.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र