बदलापुरात २५० रोपांचे वाटप करून वटपौर्णिमा साजरी

मागील आठ वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेनेने राबवला स्तुत्य उपक्रम


बदलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या सुवर्ण सतीश साटपे यांच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना २५० रोपांचे वाटप करून वडाची पूजा करण्यात आली. शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक ७ च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मागील आठ वर्षे प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी विभागातील शिवशांती कॉम्प्लेक्स व भवानीशंकर बिल्डिंगजवळ येतात. या ठिकाणी आलेल्या महिलांना मागील आठ वर्षांपासून सातत्याने एक रोप वितरित केले जाते. मागील वर्षी या महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. तुळस ही पूर्ण वेळ ऑक्सिजन देणारे झाड असून महिला दररोज तुळशीच्या झाडाची पूजा करतात यावर्षी आपण चार विविध प्रकारची रोपे आणून त्यांचे या महिलांना वाटप केले आहे.


यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट, तुळस व फायकस तसेच रिबीन ग्लास या इनडोअर व आउटडोर शोभेच्या रोपांचे वाटप करण्यात आले. काही रोपे ही शोभेची असून ती घराच्या आत मध्ये किंवा घराच्या बाहेर या दोन्ही ठिकाणी ठेवता येऊ शकतात. यापूर्वी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते कारण वटपौर्णिमेनिमित्ताने महिला बाजारातून वडाची तोडलेली फांदी घेऊन येतात व त्याची पूजा करतात. याचा बोध घेऊन आपण वडाच्या रोपाचे वाटप केले होते ज्यामुळे महिलांनी त्या रोपाचे घरी संगोपन करून पुढच्या वर्षी त्याचीच पूजा करावी हा या मागचा हेतू असतो.


यावेळी विभागातील महिलांनी मागील वर्षी वाटप केलेल्या झाडाच्या आठवणी सांगितल्या. त्या झाडाला आमच्या बाल्कनीत, आमच्या घरात कुंडीमध्ये लावले आहे आणि त्याची जोपासनाकरीत आहोत अशा आठवणी यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगितल्या.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये