संयुक्त राष्ट्रांनी जगातील १४ देशांचा आढावा घेतला. प्रत्येक देशाची लकसंख्या, तिथला जन्मदर अशी अनेक माहिती संकलित करण्यात आली. प्रत्येक देशातील नागरिकांशी चर्चा करुन त्यांचे पुढल्या पिढीला जन्म देण्याबाबतचे मत जाणून घेण्यात आले. यातूनच जन्मदरातील वाढ आणि घटीची प्रमुख कारणे समजली आहेत. भारतात जन्मदर १.९ टक्के एवढा कमी होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. ही कारणे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून हाती आली आहेत.
भारतात १३ टक्के दांपत्य निपुत्रिकपणाच्या समस्येमुळे पुढील पिढीला जन्म देण्यास असमर्थ आहेत. देशातील १४ टक्के दांपत्य गरोदरपणाशी संबंधित काही शारीरिक समस्यांमुळे पुढील पिढीला जन्म देण्यास असमर्थ आहेत. भारतातील १५ टक्के दांपत्य विशिष्ट आजारांमुळे पुढील पिढीला जन्म देणे टाळत आहेत. देशातली ३८ टक्के दांपत्य आर्थिक अस्थिरतेमुळे पुढील पिढीला जन्म देणे टाळत आहेत. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतही ३८ टक्के दांपत्य आर्थिक अस्थिरतेमुळे पुढील पिढीला जन्म देणे टाळत आहेत.
भारतातील २२ टक्के दांपत्य हक्काचे घर नाही म्हणून बाळाला जन्म देणे टाळत आहेत. देशातील २१ टक्के दांपत्य नोकरी - व्यवसायातील अस्थिरतेमुळे बाळाला जन्म देणे टाळत आहेत.