विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिरुवनंतपुरम येथे केले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतपुरम येथे पंतप्रधान मोदींनी पानूर ओव्हरब्रिजपासून पुथरिकंडम मैदानापर्यंत एक भव्य रोड शो केला. या दरम्यान त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. काही प्रकल्पांची पायाभरणी केली तसेच काही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच त्यांनी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचेही शुभारंभ केला आणि एक लाख लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जांचे वितरण केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की,विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे. विकसित भारताच्या निर्मितीत शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या ११ वर्षांपासून केंद्र सरकारने शहरी मूलभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की केंद्र सरकार शहरांतील गरीब कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात चार कोटींहून अधिक घरे बांधून ती गरीबांना देण्यात आली आहेत. यामध्ये शहरी गरीबांसाठी एक कोटींपेक्षा जास्त घरे उभारण्यात आली असून केरळमधील सव्वा लाख शहरी गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळाले आहे. ते पुढे म्हणाले की गरीब कुटुंबांचा वीजखर्च कमी व्हावा यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. गरीबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळत आहेत. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मातृ वंदना योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे केरळसह देशभरातील मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा लाभ झाला आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गेल्या ११ वर्षांत कोट्यवधी नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे मोठे काम करण्यात आले आहे. आता गरीब एससी, एसटी, ओबीसी, महिला तसेच मच्छीमारांनाही सहजपणे बँक कर्ज मिळत आहे. त्यांच्याकडे हमीदार नसला तरी सरकार स्वतः त्यांची हमीदार बनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान म्हणाले की रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळांत माल विकणाऱ्या रेहडी-पटरीवाल्यांची परिस्थिती पूर्वी अत्यंत बिकट होती. त्यांच्या सक्षमीकरणासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे देशभरातील लाखो रेहडी-पटरीवाल्यांना बँकांकडून मोठी मदत मिळाली असून अनेकांना आयुष्यात पहिल्यांदाच बँकेकडून कर्ज मिळाले आहे. आता केंद्र सरकार एक पाऊल पुढे टाकत या लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड देत आहे. काही वेळापूर्वी तिरुवनंतपुरम येथेही पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले. यामध्ये केरळमधील १० हजार आणि तिरुवनंतपुरममधील ६०० लाभार्थी आहेत. पूर्वी क्रेडिट कार्ड फक्त श्रीमंतांकडे असायचे, पण आता रेहडी-पटरीवाल्यांकडेही क्रेडिट कार्ड असल्याचे चित्र दिसत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.



आगामी निवडणुका केरळची दशा-दिशा बदलतील


सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ही केरळमधील दोन प्रमुख आघाड्या असून, भाजप आता तळागाळात तिसरा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले, "एलडीएफ आणि यूडीएफचे झेंडे वेगळे असले तरी त्यांचा अजेंडा एकच आहे - संपूर्ण भ्रष्टाचार आणि शून्य जबाबदारी. पूर्ण सांप्रदायिकता आणि कोणतीही उत्तरदायित्वाची भावना नाही. त्यांना माहिती आहे की पाच-दहा वर्षांनी पुन्हा सत्ता मिळेल. सरकार बदलते, पण व्यवस्था बदलत नाही. आता लोकांच्या हितासाठी आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारची गरज आहे. भाजप आणि एनडीए हे करून दाखवतील."

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक