तलासरीत अल्पवयीन मातांच्या प्रमाणात वाढ

आरोग्य विभागात ४० अल्पवयीन मातांची नोंद


तलासरी : मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये असा कायदा असताना व कायज्ञाने बालविवाहावर बंदी असल्याने अनेक ठिकाणी बाल विवाह होत नाहीत, असे असले तरी तलासरीसारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयातच प्रेम संबंधाने माता होण्याचे प्रमाण वाढले आहे.



प्रेम संबंधाने विवाह न करता अल्प वयातच तरुण-तरुणी एकत्र राहत असल्याने अल्पवयीन माताच्या प्रमाण तलासरी भागात मोठ्या प्रमाणात असले आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे. यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३ माता, वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६ माता, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११ माता, आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २० माता, अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णीयांनी दिली.


कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव यामुळे अल्प वयातच मुली शिक्षण सोडून रोजगारासाठी बाहेर पडतात, तलासरी भागात रोजगाराच्या संधी नसल्या तरी बाजूच्या गुजरात राज्य, केंद्र शासित दादरा नगर हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. या कारखान्यात तलासरी, डहाणू तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मजूर कामाला जातो, या मजुरामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे, तेथे या अल्पवयीन मुलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण होते पण या शोषणाकडे कोणाचेही लक्ष नाही. या समस्येला सामोर जाण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या