अंधेरी सबवेला पाणी साचण्याची समस्या राहणार कायम

भूमिगत टाकी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही


मुंबई  : मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले जाऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने पंपिंग स्टेशन तसेच विशेष पंपांची व्यवस्था केली जाते; परंतु आतापर्यंत हिंदमाता, मिलन सब वे येथील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी अंधेरी सबवेच्या ठिकाणी साचले जाणारे पावसाचे पाणी कायमच राहणार आहे. मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर सन २०२७च्या पावसाळ्यात दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात ही समस्या कायमस्वरुपी सुटणारी नाही. हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवले जात असले तरी अंधेरी सब वेच्या ठिकाणी अशाप्रकारे भूमिगत टाक्या बांधण्याचा मार्गच नसल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात नाही पण काही प्रमाणात पाणी तुंबण्याची समस्या कायमच राहणारी आहे.


मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात अंधेरी सब वेच्या ठिकाणी पाणी साचले गेले. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंप बसवले जात असले तरी समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास विलंब लागतो आणि परिसरात आहोटी येईपर्यंत पाणी कायमच राहते.


या ठिकाणच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनच्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १९ वर्षांपासून काम रखडले. यासाठी महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे.


याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १८ ते १९ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही कायमच राहणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यातही अंधेररीवासियांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला