वाड्यातील खुपरी गावात सौरदिव्यांनी उजळला आशेचा मार्ग

कुडूस : रात्र झाली की पाड्यांवर जाणाऱ्या पण अंधारात हरवणाऱ्या पायवाटा व पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग वर कष्ट करणाऱ्या खुपरी गावातील महिलांची कथा आता इतिहासजमा झाली आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर व त्यांच्या सी.एस.आर. भागीदार एस.आय.टी.ए. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटिंग (इंडिया) प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नातून १२ लाख रुपये खर्चून खुपरी गावात ५४ सौर रस्त्याचे दिवे व २ सौर पाणी प्रकल्प यांचे लोकार्पण नुकताच करण्यात आले.



खुपरी गावातील लाटे पाडा -७, ठाकरे पाडा- १०, हडल पाडा -१७ व भोईर पाडा -२० या ठिकाणी सौर रस्त्याचे दिवे बसवण्यात आले आहेत. आता या पाड्यांतील रस्ते उजळले असून, गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचं हास्य फुलले आहे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडताना वाटेवरील भीती आता मागे पडली आहे. त्याचवेळी लाटे पाडा आणि कोंगिल पाडा येथील जुन्या हातपंप बोअरवेलना सौरऊर्जेवर चालणाऱ्या टाक्यांमध्ये रूपांतर करून महिलांना पाण्यासाठीच्या त्रासातून मुक्ती दिली आहे. खुपरी ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर पवार यांनी आनंद व्यक्त करत आमच्या गावात असा मोठा बदल घडेल, असं आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. एस.आय.टी.ए. कंपनीचे धवल व्यास, ललित तिवारी, संचालक राजेन्द्रन सर आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष अविनाश सर यांनी आमच्या गावासाठी दिलेला आधार अविस्मरणीय आहे. लवकरच येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
Comments
Add Comment

वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाची दुरवस्था

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खिळखिळे, प्रशासन सुस्त वाडा : वाडा-भिवंडी-मनोर या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या

डहाणू नगर परिषदेत पुन्हा एकदा भरत ‘राज’

भाजप जिल्हाध्यक्ष राजपूत यांची स्वीकृत आणि स्थायी समिती सदस्यपदी निवड गणेश पाटील पालघर : डहाणू नगर परिषदेच्या

पालघरमधील विविध प्रकल्पांविरुद्ध संघटनांचा आक्रोश मोर्चा

‘कष्टकरी’, माकपसह अनेक संघटना सहभागी पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदर, चौथी मुंबई आणि

एससी, एसटी, ओबीसी आरक्षण ‘राजयोग’ आणणार

बविआकडे अनु. जमातीचे पाच, मागासवर्गीय तीन नगरसेवक गणेश पाटील,विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही