वाड्यातील खुपरी गावात सौरदिव्यांनी उजळला आशेचा मार्ग

कुडूस : रात्र झाली की पाड्यांवर जाणाऱ्या पण अंधारात हरवणाऱ्या पायवाटा व पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग वर कष्ट करणाऱ्या खुपरी गावातील महिलांची कथा आता इतिहासजमा झाली आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर व त्यांच्या सी.एस.आर. भागीदार एस.आय.टी.ए. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटिंग (इंडिया) प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नातून १२ लाख रुपये खर्चून खुपरी गावात ५४ सौर रस्त्याचे दिवे व २ सौर पाणी प्रकल्प यांचे लोकार्पण नुकताच करण्यात आले.



खुपरी गावातील लाटे पाडा -७, ठाकरे पाडा- १०, हडल पाडा -१७ व भोईर पाडा -२० या ठिकाणी सौर रस्त्याचे दिवे बसवण्यात आले आहेत. आता या पाड्यांतील रस्ते उजळले असून, गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचं हास्य फुलले आहे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडताना वाटेवरील भीती आता मागे पडली आहे. त्याचवेळी लाटे पाडा आणि कोंगिल पाडा येथील जुन्या हातपंप बोअरवेलना सौरऊर्जेवर चालणाऱ्या टाक्यांमध्ये रूपांतर करून महिलांना पाण्यासाठीच्या त्रासातून मुक्ती दिली आहे. खुपरी ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर पवार यांनी आनंद व्यक्त करत आमच्या गावात असा मोठा बदल घडेल, असं आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. एस.आय.टी.ए. कंपनीचे धवल व्यास, ललित तिवारी, संचालक राजेन्द्रन सर आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष अविनाश सर यांनी आमच्या गावासाठी दिलेला आधार अविस्मरणीय आहे. लवकरच येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
Comments
Add Comment

Viral Video : सफाळेत एसटी चालकाने युनिफॉर्म काढून थोपटले दंड; प्रवाशाला दिलं खुलं आव्हान, बस डेपोत जोरदार राडा

पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध