वाड्यातील खुपरी गावात सौरदिव्यांनी उजळला आशेचा मार्ग

  60

कुडूस : रात्र झाली की पाड्यांवर जाणाऱ्या पण अंधारात हरवणाऱ्या पायवाटा व पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग वर कष्ट करणाऱ्या खुपरी गावातील महिलांची कथा आता इतिहासजमा झाली आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर व त्यांच्या सी.एस.आर. भागीदार एस.आय.टी.ए. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटिंग (इंडिया) प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नातून १२ लाख रुपये खर्चून खुपरी गावात ५४ सौर रस्त्याचे दिवे व २ सौर पाणी प्रकल्प यांचे लोकार्पण नुकताच करण्यात आले.



खुपरी गावातील लाटे पाडा -७, ठाकरे पाडा- १०, हडल पाडा -१७ व भोईर पाडा -२० या ठिकाणी सौर रस्त्याचे दिवे बसवण्यात आले आहेत. आता या पाड्यांतील रस्ते उजळले असून, गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचं हास्य फुलले आहे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडताना वाटेवरील भीती आता मागे पडली आहे. त्याचवेळी लाटे पाडा आणि कोंगिल पाडा येथील जुन्या हातपंप बोअरवेलना सौरऊर्जेवर चालणाऱ्या टाक्यांमध्ये रूपांतर करून महिलांना पाण्यासाठीच्या त्रासातून मुक्ती दिली आहे. खुपरी ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर पवार यांनी आनंद व्यक्त करत आमच्या गावात असा मोठा बदल घडेल, असं आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. एस.आय.टी.ए. कंपनीचे धवल व्यास, ललित तिवारी, संचालक राजेन्द्रन सर आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष अविनाश सर यांनी आमच्या गावासाठी दिलेला आधार अविस्मरणीय आहे. लवकरच येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
Comments
Add Comment

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

  मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या