पनवेलमध्ये बांगलादेशींचा सुळसुळाट, 'घरजावई' बनलेत: छापासत्र थांबणार की वाढणार?

पनवेल बांगलादेशींचा मोठा अड्डा! ३५ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई


पनवेल : पनवेल पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांच्या मोठ्या अड्ड्यामुळे चर्चेत आहे. पनवेल शहर आणि तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असली तरी, हा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यापूर्वीही अनेकदा कारवाई करूनही हे नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चिखले गावातील एक बांगलादेशी नागरिक तर इतका निर्ढावलेला आहे की, पाच-सहा वर्षांपूर्वी कारवाई होऊनही तो आजही तिथेच 'घरजावई' बनून राहत आहे!



९ मे रोजी पनवेल तालुका पोलिसांना खेरणे परिसरात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईत ११ पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं.


त्याचबरोबर, पनवेल शहर पोलिसांना तक्का कातकरवाडी येथेही बांगलादेशी नागरिक असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तिथेही छापा टाकून ४ पुरुष, ३ महिला आणि ५ मुलांसह एकूण १२ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली.


या सातत्याने होणाऱ्या कारवाया आणि त्यानंतरही बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या, हा पनवेलसाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Comments
Add Comment

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे

Pratap Sarnaik : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई : (३ डिसेंबर) शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या '

सरकारकडून सारथी ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय मागे, लोकाग्रहास्तव सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: आज अखेर सरकारने लोकाग्रहास्तव आपला निर्णय मागे घेतला आहे. सरकारने आज लोकसभेत देखील लोकांच्या

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,