पनवेलमध्ये बांगलादेशींचा सुळसुळाट, 'घरजावई' बनलेत: छापासत्र थांबणार की वाढणार?

पनवेल बांगलादेशींचा मोठा अड्डा! ३५ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई


पनवेल : पनवेल पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांच्या मोठ्या अड्ड्यामुळे चर्चेत आहे. पनवेल शहर आणि तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असली तरी, हा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यापूर्वीही अनेकदा कारवाई करूनही हे नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चिखले गावातील एक बांगलादेशी नागरिक तर इतका निर्ढावलेला आहे की, पाच-सहा वर्षांपूर्वी कारवाई होऊनही तो आजही तिथेच 'घरजावई' बनून राहत आहे!



९ मे रोजी पनवेल तालुका पोलिसांना खेरणे परिसरात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईत ११ पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं.


त्याचबरोबर, पनवेल शहर पोलिसांना तक्का कातकरवाडी येथेही बांगलादेशी नागरिक असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तिथेही छापा टाकून ४ पुरुष, ३ महिला आणि ५ मुलांसह एकूण १२ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली.


या सातत्याने होणाऱ्या कारवाया आणि त्यानंतरही बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या, हा पनवेलसाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील