मुंबईत खाडी किनारीच्या इमारतींना धोका

मुंबई : मुंबईत खाडी किनारच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याचे रहिवाशांकडून बोलले जात आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर कामोठे खाडीकिनारी टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसविण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बजेटमध्ये घर मिळत असल्यामुळे मुंबई उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी काही वर्षांपूर्वी कामोठे नोडमध्ये घरे विकत घेतली. येथील सेक्टर ३४, ३५ आणि ३६ हा खाडीकिनारपट्टीचा परिसर मागील १० ते १५ वर्षांत इमारतींनी गजबजून गेला आहे. हक्काचे घर घेतल्याचे समाधान कालांतराने भरतीच्या पाण्यामुळे ओसरू लागले आहे. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी इमारतीवर सतत आदळत असल्याने पाया हळूहळू खचू लागला आहे. याची जास्त झळ येथे जाणवत आहे.



कॉम्प्लेक्समध्ये एकूण ७२ सदनिका आणि १३ गाळे आहेत. १ मार्च २००७ मध्ये बांधकाम व्यावसायिकाने इमारत रहिवाशांना हस्तांतरित केली, त्या वेळी परिसरात सिडकोने ९० फूट रस्ता प्रस्तावित केला होता, मात्र कांदळवन संरक्षण कायद्यातील बदलामुळे रस्त्याचे नियोजन बारगळले आहे. याचा फटका रहिवाशांना बसला आहे.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील