मुंबईत खाडी किनारीच्या इमारतींना धोका

  43

मुंबई : मुंबईत खाडी किनारच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याचे रहिवाशांकडून बोलले जात आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर कामोठे खाडीकिनारी टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसविण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बजेटमध्ये घर मिळत असल्यामुळे मुंबई उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी काही वर्षांपूर्वी कामोठे नोडमध्ये घरे विकत घेतली. येथील सेक्टर ३४, ३५ आणि ३६ हा खाडीकिनारपट्टीचा परिसर मागील १० ते १५ वर्षांत इमारतींनी गजबजून गेला आहे. हक्काचे घर घेतल्याचे समाधान कालांतराने भरतीच्या पाण्यामुळे ओसरू लागले आहे. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी इमारतीवर सतत आदळत असल्याने पाया हळूहळू खचू लागला आहे. याची जास्त झळ येथे जाणवत आहे.



कॉम्प्लेक्समध्ये एकूण ७२ सदनिका आणि १३ गाळे आहेत. १ मार्च २००७ मध्ये बांधकाम व्यावसायिकाने इमारत रहिवाशांना हस्तांतरित केली, त्या वेळी परिसरात सिडकोने ९० फूट रस्ता प्रस्तावित केला होता, मात्र कांदळवन संरक्षण कायद्यातील बदलामुळे रस्त्याचे नियोजन बारगळले आहे. याचा फटका रहिवाशांना बसला आहे.

Comments
Add Comment

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी