मुंबईत खाडी किनारीच्या इमारतींना धोका

मुंबई : मुंबईत खाडी किनारच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याचे रहिवाशांकडून बोलले जात आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर कामोठे खाडीकिनारी टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसविण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बजेटमध्ये घर मिळत असल्यामुळे मुंबई उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी काही वर्षांपूर्वी कामोठे नोडमध्ये घरे विकत घेतली. येथील सेक्टर ३४, ३५ आणि ३६ हा खाडीकिनारपट्टीचा परिसर मागील १० ते १५ वर्षांत इमारतींनी गजबजून गेला आहे. हक्काचे घर घेतल्याचे समाधान कालांतराने भरतीच्या पाण्यामुळे ओसरू लागले आहे. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी इमारतीवर सतत आदळत असल्याने पाया हळूहळू खचू लागला आहे. याची जास्त झळ येथे जाणवत आहे.



कॉम्प्लेक्समध्ये एकूण ७२ सदनिका आणि १३ गाळे आहेत. १ मार्च २००७ मध्ये बांधकाम व्यावसायिकाने इमारत रहिवाशांना हस्तांतरित केली, त्या वेळी परिसरात सिडकोने ९० फूट रस्ता प्रस्तावित केला होता, मात्र कांदळवन संरक्षण कायद्यातील बदलामुळे रस्त्याचे नियोजन बारगळले आहे. याचा फटका रहिवाशांना बसला आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल