पतौडी ट्रॉफी नाही आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी

  96

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात पतौडी ट्रॉफी खेळवली जात होती. आता या ट्रॉफीचे नामांतर करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी परस्पर सहमतीने घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final होणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या विशेष सोहळ्यातच अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये १८८ सामने खेळून ७०४ बळी घेतले आहेत. तर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळून १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. अँडरसनने १४ कसोटी सामन्यांमध्ये सचिनला नऊ वेळा बाद केले होते. १९८९ ते २०२४ या कालावधीत सचिन आणि अँडरसन यांनी एकत्रितपणे ३८८ कसोटी सामने खेळले. यामुळेच ट्रॉफीला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका २०२५

पहिली कसोटी २० ते २४ जून - हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - केनिंग्टन ओव्हल, लंडन
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल