पतौडी ट्रॉफी नाही आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात पतौडी ट्रॉफी खेळवली जात होती. आता या ट्रॉफीचे नामांतर करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी परस्पर सहमतीने घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final होणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या विशेष सोहळ्यातच अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये १८८ सामने खेळून ७०४ बळी घेतले आहेत. तर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळून १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. अँडरसनने १४ कसोटी सामन्यांमध्ये सचिनला नऊ वेळा बाद केले होते. १९८९ ते २०२४ या कालावधीत सचिन आणि अँडरसन यांनी एकत्रितपणे ३८८ कसोटी सामने खेळले. यामुळेच ट्रॉफीला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका २०२५

पहिली कसोटी २० ते २४ जून - हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - केनिंग्टन ओव्हल, लंडन
Comments
Add Comment

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर