पतौडी ट्रॉफी नाही आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात पतौडी ट्रॉफी खेळवली जात होती. आता या ट्रॉफीचे नामांतर करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी परस्पर सहमतीने घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final होणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या विशेष सोहळ्यातच अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये १८८ सामने खेळून ७०४ बळी घेतले आहेत. तर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळून १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. अँडरसनने १४ कसोटी सामन्यांमध्ये सचिनला नऊ वेळा बाद केले होते. १९८९ ते २०२४ या कालावधीत सचिन आणि अँडरसन यांनी एकत्रितपणे ३८८ कसोटी सामने खेळले. यामुळेच ट्रॉफीला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका २०२५

पहिली कसोटी २० ते २४ जून - हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - केनिंग्टन ओव्हल, लंडन
Comments
Add Comment

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन