प्रहार    

सांडपाणीमुक्त पवई तलावासाठी लढा सुरूच

  43

सांडपाणीमुक्त पवई तलावासाठी लढा सुरूच

मूक साखळी रद्द, मात्र नागरिकांचा निर्धार कायम


मुंबई : पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात रविवारी आयोजित करण्यात आलेली मूक मानवी साखळी अंतिम क्षणी रद्द करण्यात आली. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतरही महानगरपालिकेने आवश्यक ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ न दिल्यामुळे ही साखळी आयोजित करता आली नाही.


तरीदेखील तलावाचे प्रदूषण थांबवण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पवई तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. सांडपाण्यामुळे तलावाची परिसंस्था धोक्यात येते. याविरोधात आम्ही शांततेत निदर्शने करत आहोत, परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे आंदोलन थांबलेले नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.


काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालावाची स्वच्छता करण्यासाठी आणि तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी ‘सेव्ह पवई लेक’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, पवई तालावातील जलपर्णीचा वेढा रोखण्यासाठी तालावातील सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) समन्वय समितीची बैठकही घेतली होती. तरीही आजपर्यंत सांडपाणी थेट तलावात सोडले जाते हे धक्कादायक आहे, असे पर्यावरणप्रेमी बी.एन.कुमार यांनी सांगितले. तलाव संवर्धन क्षेत्र घोषित करावे पवई तलाव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करावा, अशी मागणी पवईतील जलवायू विहार येथील रहिवासी पामेला चीमा आणि इतर रहिवाशांनी केली आहे. तेथील रहिवासी म्हणून आम्ही परिसराचे संरक्षण करण्यास बांधील आहोत, असे मत बी.एन.कुमार यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : महायुतीचा विजय हिंदूंच्या मतांवर, बाकी धर्मियांचे मतदान शून्य : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे

कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर

Devendra Fadnavis BDD Chawl : 'छप्पर गळतंय, भिंती पडतायत'… BDD रहिवाशांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेला हृदयद्रावक किस्सा

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला आज ऐतिहासिक वळण मिळाले. मुख्यमंत्री

कबुतरखान्यावर राज ठाकरेंची पहिली सडेतोड प्रतिक्रिया "या वादात लोढा-बिढांनी येऊ नये"

मुंबई : गेल्या काही दिवसापासून दादरमधील कबुतरखाना वाद पेटला असून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच

Shilpa Shetty And Raj Kundra : ६० कोटींचा घोटाळा? शिल्पा-राज पुन्हा कोर्टाच्या दारात, आता काय केलं नेमकं?

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) वादाच्या भोवऱ्यात अडकले

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

मुंबई : ‘बिग बॉस १८’मुळे (Bigg Boss 18) पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदच्या दशकात गाजवलेली