ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी सुमारे १३ लाख विद्याथ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या प्रवेश फेरीसाठी १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही नोंदणी पुरेशा प्रमाणात झालेली असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली.


राज्यात दहावीत राज्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांची संख्या ही १३ लाख ८७ हजार असून, इतर मंडळातील संख्या एक लाख हजारांच्या दरम्यान आहे. असे एकूण १५ लाख २० हजारांच्या दरम्यान दहावीतील विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षांतील अकरावीची आकडेवारी लक्षात घेता अकरावीला १३ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात, तर उवरित व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण आदी शाखेकडे वळतात.


या पार्श्वभूमीवर यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत १२ लाख ७१ हजार विद्याथ्यांनी नोंदणी केली. त्यातील १२ लाख पाच हजार विद्याथ्र्यांनी या नोंदणीचे शुल्क भरून प्रवेशाचा पहिला भाग पूर्ण केला असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्याथ्यांना पाचही टप्प्यांवर नोंदणी, प्राधान्यक्रम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज भरताना शेवटच्या दिवसापर्यंत अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आल्याने याचा विद्याथ्यांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.