ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी सुमारे १३ लाख विद्याथ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या प्रवेश फेरीसाठी १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही नोंदणी पुरेशा प्रमाणात झालेली असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली.


राज्यात दहावीत राज्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांची संख्या ही १३ लाख ८७ हजार असून, इतर मंडळातील संख्या एक लाख हजारांच्या दरम्यान आहे. असे एकूण १५ लाख २० हजारांच्या दरम्यान दहावीतील विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षांतील अकरावीची आकडेवारी लक्षात घेता अकरावीला १३ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात, तर उवरित व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण आदी शाखेकडे वळतात.


या पार्श्वभूमीवर यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत १२ लाख ७१ हजार विद्याथ्यांनी नोंदणी केली. त्यातील १२ लाख पाच हजार विद्याथ्र्यांनी या नोंदणीचे शुल्क भरून प्रवेशाचा पहिला भाग पूर्ण केला असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्याथ्यांना पाचही टप्प्यांवर नोंदणी, प्राधान्यक्रम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज भरताना शेवटच्या दिवसापर्यंत अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आल्याने याचा विद्याथ्यांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस