ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

  61

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी सुमारे १३ लाख विद्याथ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या प्रवेश फेरीसाठी १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही नोंदणी पुरेशा प्रमाणात झालेली असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली.


राज्यात दहावीत राज्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांची संख्या ही १३ लाख ८७ हजार असून, इतर मंडळातील संख्या एक लाख हजारांच्या दरम्यान आहे. असे एकूण १५ लाख २० हजारांच्या दरम्यान दहावीतील विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षांतील अकरावीची आकडेवारी लक्षात घेता अकरावीला १३ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात, तर उवरित व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण आदी शाखेकडे वळतात.


या पार्श्वभूमीवर यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत १२ लाख ७१ हजार विद्याथ्यांनी नोंदणी केली. त्यातील १२ लाख पाच हजार विद्याथ्र्यांनी या नोंदणीचे शुल्क भरून प्रवेशाचा पहिला भाग पूर्ण केला असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्याथ्यांना पाचही टप्प्यांवर नोंदणी, प्राधान्यक्रम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज भरताना शेवटच्या दिवसापर्यंत अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आल्याने याचा विद्याथ्यांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक