मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ?

कोपरगाव : शहरात मोकाट जनावरे, गायी, वळू, गाढव, डुकरे, कुत्रे यांच्याकडून निष्पाप नागरीकांना नेहमीच त्रास होतो. सावरकर चौकात जनावरांनी एका दाम्पत्याला जोरदार हुंदडले, त्यात ते जखमी झाले. नागरीक या जनावरांचा बंदोबस्त करावा याची मागणी करतात. काही दिवस जातात पुन्हा पुन्हा हा प्रश्न उपस्थित होतो. नगरपालिका या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


मागील काही वर्षांपूर्वी या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी आंदोलने केली. मोकाट जनावरे नगर पालिकेच्या आवारात हुसकावून नेली. त्यांच्या गळ्यात "भावी नेते, नगरसेवक, नगरअध्यक्ष, आमदार मुख्याधिकारी" अशा उपहासात्मक बोर्ड लावले.त्यावेळी तरी या जनावरांचा बंदोबस्त करतील असे वाटले होते.


मात्र एका बेगडी गो प्रेमींने गो मातेला मोकाट हा शब्द वापरू नका असा सल्ला दिला.या पुर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्यात दोन लहान मुले जखमी झाले. डुकराने एका महिलेवर हल्ला केला. अशा एक ना अनेक घटना घडल्या आहेत.


मोकाट जनावरांचा सर्व्हे करून त्यांना शिंगांना रेडियम अथवा विशिष्ट बॅच लावावे असे सुचवले. नगर पालिकेच्या गतिमान प्रशासनाला जाग आल्यावर कुत्रे पकडण्याचे टेंडर काढले जाते. कुत्रे गावा बाहेर सोडल्यावर पुन्हा गावात येतात डुकरांच्या मालका सोबत नगर पालिका कर्मचारी संगनमत हा व्यवसाय करतात.


ही डुकरे मोठ्या शहरात विक्री केली जातात अशी खाजगीत चर्चा केली जाते. दूसरी धक्का दायक माहिती अशी की, गो मांस विक्रीचा व्यवसाय शहरात जोरात सुरू आहे. नवीन आणलेली जनावरे शहरात सोडून दिली जातात. नवीन व नवीन जनावरे यांच्यात रस्त्यांवर संघर्ष होतो या जनावरांची मोजदाद नसल्याने तेच पुढे या चुकीच्या कामासाठी वापरली जातात. त्यात सुध्दा काही लोकांचे हात ओले केले जातात.


नगर पालिका प्रशासन यांनी नागरिकांची ओरड झाल्यावर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्णय घेतला तर लगेचच काही पशू प्रेमी विरोध करतात.कर्मचाऱ्यांना दम दाटी करतात.त्यांची तक्रार प्राणीमात्र संघटने कडे करू अशी धमकी देऊन आर्थिक तडजोडी केल्या जातात.अशा प्रकारे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो मात्र वास्तव सब गोल माल है भाई सब गोल माल है असेच दिसते. अशी टीका लोकसभा आंदोलनाचे ॲड नितीन पोळ" यांनी केली आहे.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील