लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास


विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना प्रवासामध्ये दिलेल्या ५० टक्के तिकीट सवलतीला महिलांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १८ हजार प्रवासी संख्या असलेल्या महिला प्रवाशांचा आकडा पाचव्या दिवशी ३० हजारावर गेला आहे.


महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७ मार्गांवर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. वसईच्या विद्यमान आमदार स्नेहा दुबे पंडित आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांकडून या उपक्रमाच्या श्रेयासाठी करण्यात आलेल्या दाव्यावरून ही योजना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता वसई-विरार महापालिकेच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये या योजनेची खूप चर्चा आहे.



तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना एक जूनपासून प्रारंभ करण्यात आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशीपासून महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेलेला आहे. २ जून रोजी २५ हजार ११२, ३ जून रोजी २८ हजार ०५०,४ जूनला २८ हजार ५७५ आणि ५ जून रोजी ३० हजार ३९२ अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये एकूण १ लाख ३० हजार ९८५ महिला प्रवाशांनी सवलतीच्या तिकीट दराचा फायदा घेत महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत असल्याबाबत महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत आहे.



वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग पीडित रुग्ण अशा काही प्रवाशांना मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विश्वनाथ तळेकर, सहा.आयुक्त परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका
Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील