लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास


विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना प्रवासामध्ये दिलेल्या ५० टक्के तिकीट सवलतीला महिलांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १८ हजार प्रवासी संख्या असलेल्या महिला प्रवाशांचा आकडा पाचव्या दिवशी ३० हजारावर गेला आहे.


महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७ मार्गांवर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. वसईच्या विद्यमान आमदार स्नेहा दुबे पंडित आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांकडून या उपक्रमाच्या श्रेयासाठी करण्यात आलेल्या दाव्यावरून ही योजना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता वसई-विरार महापालिकेच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये या योजनेची खूप चर्चा आहे.



तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना एक जूनपासून प्रारंभ करण्यात आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशीपासून महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेलेला आहे. २ जून रोजी २५ हजार ११२, ३ जून रोजी २८ हजार ०५०,४ जूनला २८ हजार ५७५ आणि ५ जून रोजी ३० हजार ३९२ अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये एकूण १ लाख ३० हजार ९८५ महिला प्रवाशांनी सवलतीच्या तिकीट दराचा फायदा घेत महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत असल्याबाबत महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत आहे.



वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग पीडित रुग्ण अशा काही प्रवाशांना मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विश्वनाथ तळेकर, सहा.आयुक्त परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका
Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या