लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

  58

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास


विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना प्रवासामध्ये दिलेल्या ५० टक्के तिकीट सवलतीला महिलांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १८ हजार प्रवासी संख्या असलेल्या महिला प्रवाशांचा आकडा पाचव्या दिवशी ३० हजारावर गेला आहे.


महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७ मार्गांवर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. वसईच्या विद्यमान आमदार स्नेहा दुबे पंडित आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांकडून या उपक्रमाच्या श्रेयासाठी करण्यात आलेल्या दाव्यावरून ही योजना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता वसई-विरार महापालिकेच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये या योजनेची खूप चर्चा आहे.



तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना एक जूनपासून प्रारंभ करण्यात आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशीपासून महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेलेला आहे. २ जून रोजी २५ हजार ११२, ३ जून रोजी २८ हजार ०५०,४ जूनला २८ हजार ५७५ आणि ५ जून रोजी ३० हजार ३९२ अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये एकूण १ लाख ३० हजार ९८५ महिला प्रवाशांनी सवलतीच्या तिकीट दराचा फायदा घेत महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत असल्याबाबत महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत आहे.



वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग पीडित रुग्ण अशा काही प्रवाशांना मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विश्वनाथ तळेकर, सहा.आयुक्त परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका
Comments
Add Comment

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध