संवाद एकाकी फुलाशी

सहजच : शुभांगी मांडे खारकर


त्या फुलाला कुणीतरी विचारलं, एकटा एकटा राहतोस कंटाळा नाही येत? भीती नाही वाटत? त्यावर ते चिमुकले फूल म्हणाले, अरे एकटा कुठे आहे मी? सकाळ झाली की गुंजन करत भवरा येतो की आणि आजूबाजूच्या झाडांची खबरबात मला देतो. दोन घटका त्याचंही मन मोकळं होतं आणि माझंही.


वारा तर सतत माझ्याभोवती रुंजी घालत असतो. कधी झुळूक बनून तर कधी सुसाट. पावसाला तर माझी इतकी काळजी की कितीही जोरात आला तरी माझ्या अंगावर मात्र हळुवार तुषार टाकतो बघ. पुरतात मला तेव्हढे आणि सकाळची कोवळी उन्हाची तिरीप माझी ख्यालीखुशाली विचारून भरकन बाजूला होते. आता सांग कुठे मी एकटा आहे?


आज सकाळी मात्र शाळेत जाताना एका मुलाने पायाने एक दगड इतक्या जोरात उडवला, की माझा तर जीवच घाबरला. लागला नाही मला तो दगड. पण नीट निरखून पाहिलं मी त्या लेकराकडे तेव्हा रडवेला चेहरा झाला होता रे त्याचा. आई रागावली होती की काय कुणास ठाऊक.


परवा तर मजाच झाली बघ. पांढऱ्या पांढऱ्या केसांची एक आजी डुलत डुलत माझ्याजवळ येऊन थांबली आणि खुदकन हसली! मी पण हसलो... काय आठवलं असेल रे तिला? अशी सोबत होते बघ मला, मग मी एकटा कसा?


ते बघ, ते आजोबा येत आहेत ना... अरे समोर बघ ना, वेंधळाच आहेस अगदी. अरे हे जवळ येऊन थांबले आहेत ना, ते आजोबा... रोजच माझ्या जवळ येऊन थांबतात, मग डोळे पुसत पुसत पुढे निघून जातात. मला पण वाईट वाटतं बघ. पण विचारणार कसं? कुणाच्या आठवणीने असे उदास होत असतील रे? पाहिलंस, किsssती वेळ झाला तुझ्याशी गप्पा मारत बसले आहे मी. तू तुझ्या बाटलीमधलं पाणी दिलंस मला आणि फोटो तर सतत काढतच आहेस. कसे आले आहेत ते फोटो?


आता नाही ना मी एकटा वाटत? अरे एकटं कुणी नसतच या जगात. माणसं, झाडं, प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, चांदण्यांनी भरलेलं आभाळ कळलं...!


आणि एक सांगू एकटं असलं तरी चालतं रे पण कुणी एकाकी होऊ नये इतकच...!

Comments
Add Comment

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती: भालचंद्र ठोंबरे अधर्मी कृत्ये करणारे, पापी, दरोडेखोर यांना ऋषीमुनींनी केलेल्या

नको त्या संगतीत ‘टीनएजर्स’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन

लोकमाता अहिल्याबाई होळकर

स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या

‘कर चले हम सलाम…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती

कदाचित हा तूमचा अखेरचा चित्रपट ठरु शकतो

स्मृतीपटल : अनिल तोरणे  अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच ठरलेल्या वेळी चित्रपटाच्या सेटवर हजर राहणाऱ्या

पहिला पाऊस

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे येरे येरे पावसा... खूप सुंदर कविता. तुमच्या आमच्या बालपणातील. उन्हाच्या झळांनी लाहीलाही