येऊर जंगलात प्लास्टिक विरोधात स्वच्छता मोहीम

ठाणे  : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असतानाच, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, काच व अन्य घनकचरा गोळा करण्यात आला.


गेल्या काही वर्षांपासून येऊर वन परिक्षेत्रात फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, व मद्यपानानंतर टाकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे जंगलात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यामुळे केवळ जंगलाचे सौंदर्यच नाही तर प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन संरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अनिता पाटील व उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पर्यावरण प्रेमींनी संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांनी हातात ग्लोव्हज्, कचरा गोळा करण्याचे साहित्य घेत जंगलात फिरून विविध भागांतील प्लास्टिक, थर्माकोल, काच, सिगारेट पाकिटे व इतर अविघटनशील कचरा संकलित केला असल्याची माहिती वनपाल रमाकांत मोरे यांनी दिली


या उपक्रमादरम्यान वन विभागाने पर्यावरण जागृतीसाठी माहिती फलकही उभारले. ‘कृपया प्लास्टिक जंगलात टाकू नका’, ‘निसर्ग हा आपल्या पुढच्या पिढ्यांचा हक्क आहे’ अशा संदेशांद्वारे पर्यटकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. या स्वच्छता मोहिमेत वनपाल रमाकांत मोरे, आशुतोष पवार, केशव बनसोडे आणि पर्यावरण प्रेमी मिलिंद जाधव, अतुल मोरे, नीलेश शिवशरण आदींनी अथक परिश्रम घेतले.



“जंगल हे केवळ पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट नसून, हजारो वन्यजीवांचे घर आहे. अशा मोहिमांमधून हे पटवून देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. येऊरमधील आजची स्वच्छता मोहीम ही एक सकारात्मक सुरुवात आहे – जी भविष्यातील शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा पाया ठरू शकते.”
- प्रदीप पाटील (उपसंचालक येऊर वन विभाग)

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या