येऊर जंगलात प्लास्टिक विरोधात स्वच्छता मोहीम

ठाणे  : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असतानाच, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, काच व अन्य घनकचरा गोळा करण्यात आला.


गेल्या काही वर्षांपासून येऊर वन परिक्षेत्रात फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, व मद्यपानानंतर टाकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे जंगलात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यामुळे केवळ जंगलाचे सौंदर्यच नाही तर प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन संरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अनिता पाटील व उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पर्यावरण प्रेमींनी संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांनी हातात ग्लोव्हज्, कचरा गोळा करण्याचे साहित्य घेत जंगलात फिरून विविध भागांतील प्लास्टिक, थर्माकोल, काच, सिगारेट पाकिटे व इतर अविघटनशील कचरा संकलित केला असल्याची माहिती वनपाल रमाकांत मोरे यांनी दिली


या उपक्रमादरम्यान वन विभागाने पर्यावरण जागृतीसाठी माहिती फलकही उभारले. ‘कृपया प्लास्टिक जंगलात टाकू नका’, ‘निसर्ग हा आपल्या पुढच्या पिढ्यांचा हक्क आहे’ अशा संदेशांद्वारे पर्यटकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. या स्वच्छता मोहिमेत वनपाल रमाकांत मोरे, आशुतोष पवार, केशव बनसोडे आणि पर्यावरण प्रेमी मिलिंद जाधव, अतुल मोरे, नीलेश शिवशरण आदींनी अथक परिश्रम घेतले.



“जंगल हे केवळ पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट नसून, हजारो वन्यजीवांचे घर आहे. अशा मोहिमांमधून हे पटवून देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. येऊरमधील आजची स्वच्छता मोहीम ही एक सकारात्मक सुरुवात आहे – जी भविष्यातील शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा पाया ठरू शकते.”
- प्रदीप पाटील (उपसंचालक येऊर वन विभाग)

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील