येऊर जंगलात प्लास्टिक विरोधात स्वच्छता मोहीम

  61

ठाणे  : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असतानाच, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, काच व अन्य घनकचरा गोळा करण्यात आला.


गेल्या काही वर्षांपासून येऊर वन परिक्षेत्रात फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, व मद्यपानानंतर टाकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे जंगलात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यामुळे केवळ जंगलाचे सौंदर्यच नाही तर प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन संरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अनिता पाटील व उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पर्यावरण प्रेमींनी संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांनी हातात ग्लोव्हज्, कचरा गोळा करण्याचे साहित्य घेत जंगलात फिरून विविध भागांतील प्लास्टिक, थर्माकोल, काच, सिगारेट पाकिटे व इतर अविघटनशील कचरा संकलित केला असल्याची माहिती वनपाल रमाकांत मोरे यांनी दिली


या उपक्रमादरम्यान वन विभागाने पर्यावरण जागृतीसाठी माहिती फलकही उभारले. ‘कृपया प्लास्टिक जंगलात टाकू नका’, ‘निसर्ग हा आपल्या पुढच्या पिढ्यांचा हक्क आहे’ अशा संदेशांद्वारे पर्यटकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. या स्वच्छता मोहिमेत वनपाल रमाकांत मोरे, आशुतोष पवार, केशव बनसोडे आणि पर्यावरण प्रेमी मिलिंद जाधव, अतुल मोरे, नीलेश शिवशरण आदींनी अथक परिश्रम घेतले.



“जंगल हे केवळ पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट नसून, हजारो वन्यजीवांचे घर आहे. अशा मोहिमांमधून हे पटवून देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. येऊरमधील आजची स्वच्छता मोहीम ही एक सकारात्मक सुरुवात आहे – जी भविष्यातील शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा पाया ठरू शकते.”
- प्रदीप पाटील (उपसंचालक येऊर वन विभाग)

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या