येऊर जंगलात प्लास्टिक विरोधात स्वच्छता मोहीम

ठाणे  : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असतानाच, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, काच व अन्य घनकचरा गोळा करण्यात आला.


गेल्या काही वर्षांपासून येऊर वन परिक्षेत्रात फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, व मद्यपानानंतर टाकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे जंगलात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यामुळे केवळ जंगलाचे सौंदर्यच नाही तर प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन संरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अनिता पाटील व उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पर्यावरण प्रेमींनी संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांनी हातात ग्लोव्हज्, कचरा गोळा करण्याचे साहित्य घेत जंगलात फिरून विविध भागांतील प्लास्टिक, थर्माकोल, काच, सिगारेट पाकिटे व इतर अविघटनशील कचरा संकलित केला असल्याची माहिती वनपाल रमाकांत मोरे यांनी दिली


या उपक्रमादरम्यान वन विभागाने पर्यावरण जागृतीसाठी माहिती फलकही उभारले. ‘कृपया प्लास्टिक जंगलात टाकू नका’, ‘निसर्ग हा आपल्या पुढच्या पिढ्यांचा हक्क आहे’ अशा संदेशांद्वारे पर्यटकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. या स्वच्छता मोहिमेत वनपाल रमाकांत मोरे, आशुतोष पवार, केशव बनसोडे आणि पर्यावरण प्रेमी मिलिंद जाधव, अतुल मोरे, नीलेश शिवशरण आदींनी अथक परिश्रम घेतले.



“जंगल हे केवळ पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट नसून, हजारो वन्यजीवांचे घर आहे. अशा मोहिमांमधून हे पटवून देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. येऊरमधील आजची स्वच्छता मोहीम ही एक सकारात्मक सुरुवात आहे – जी भविष्यातील शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा पाया ठरू शकते.”
- प्रदीप पाटील (उपसंचालक येऊर वन विभाग)

Comments
Add Comment

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे