टोल मागितला म्हणून कर्मचाऱ्याला ट्रकखालीच चिरडले, भरधाव वेगाने फरफटत न्हेले! विसापूर टोल पोस्टवरील धक्कादायक घटना

चंद्रपूर:  महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील विसापूर टोल पोस्टवर (Visapur Toll Post)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल कर्मचाऱ्याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचाऱ्याच्या अंगारून गाडी न्हेली, क्रूरतेचा कळस म्हणजे इथेच तो थांबला नाही तर, त्याने काही मीटर टोल कर्मचाऱ्याला फरफटत देखील न्हेले. ज्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सदर वाहन चालक बेपत्ता जरी असला तरी, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणाऱ्या एका टाटा एस कारने टोल टाळण्यासाठी लाईन ओलांडली. यादरम्यान, एका टोल कर्मचाऱ्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने गाडी थांबवली नाही आणि कर्मचाऱ्याला चिरडून गाडी भरधाव पुढे न्हेली. ज्यामध्ये टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल


जखमी झालेल्या टोल कर्मचाऱ्याचे नाव संजय अरुण वांद्रे असे आहे. त्याचे वय २७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. संजय अरुण वांद्रे हा बल्लारपूरमधील विसापूर टोल नाक्यावर संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. या घटनेनंतर बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधील विसापूर टोल नाक्यावर टोल टाळण्यासाठी टाटा एस कारचा चालक लाईन ओलंडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याला चिरडून गाडी वेगाने पुढे न्हेली. ज्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

Comments
Add Comment

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या

बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे कारवाईचे आदेश

मुंबई : सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक ठोस पाऊल उचलले आहे.