टोल मागितला म्हणून कर्मचाऱ्याला ट्रकखालीच चिरडले, भरधाव वेगाने फरफटत न्हेले! विसापूर टोल पोस्टवरील धक्कादायक घटना

चंद्रपूर:  महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील विसापूर टोल पोस्टवर (Visapur Toll Post)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल कर्मचाऱ्याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचाऱ्याच्या अंगारून गाडी न्हेली, क्रूरतेचा कळस म्हणजे इथेच तो थांबला नाही तर, त्याने काही मीटर टोल कर्मचाऱ्याला फरफटत देखील न्हेले. ज्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सदर वाहन चालक बेपत्ता जरी असला तरी, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणाऱ्या एका टाटा एस कारने टोल टाळण्यासाठी लाईन ओलांडली. यादरम्यान, एका टोल कर्मचाऱ्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने गाडी थांबवली नाही आणि कर्मचाऱ्याला चिरडून गाडी भरधाव पुढे न्हेली. ज्यामध्ये टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल


जखमी झालेल्या टोल कर्मचाऱ्याचे नाव संजय अरुण वांद्रे असे आहे. त्याचे वय २७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. संजय अरुण वांद्रे हा बल्लारपूरमधील विसापूर टोल नाक्यावर संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. या घटनेनंतर बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधील विसापूर टोल नाक्यावर टोल टाळण्यासाठी टाटा एस कारचा चालक लाईन ओलंडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याला चिरडून गाडी वेगाने पुढे न्हेली. ज्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा