जुन्या पोलीस वसाहतीच्या जागी आता आठ मजली इमारत

पावसाळ्यानंतर बांधकामाला होणार सुरुवात, निधी प्राप्त


अलिबाग : जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळच्या जुन्या पोलीस वसाहतीच्या जागी बांधण्यात येणाऱ्या नवीन वसाहतीची प्रतीक्षा आता संपलेली असून, याठिकाणी २१२ घरांची आठ मजली इमारत उभी राहणार आहे. पावसाळ्यानंतर या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


पोलीस मुख्यालय हे अलिबाग शहरात आहे. पोलिस दलात सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४० वर्षांपूर्वी मुख्यालय येथे बैठ्या चाळी बांधण्यात आल्या होत्या. कालांतराने बैठ्या चाळी जीर्ण होऊ लागल्याने त्यांची पडझड झाली. त्यामुळे एकेक चाळ रिकामी करून ती पाडण्यात आली. त्यामुळे सध्या वसाहतीची जागा मोकळीच आहे. अंमलदारांसाठी १९२, निरीक्षक १६, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसाठी चार अशी या नव्या इमारतीची रचना असेल. या बांधकामाला शासनाची परवानगी मिळालेली असून, बांधकामासाठी निधीही प्राप्त झाला आहे. निविदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे.


पोलीस मुख्यालयात पोलीस अंमलदारांसाठी एकूण ३६ शासकीय निवासस्थाने सुस्थितीत आहेत. प्रतीक्षा यादीप्रमाणे निवासस्थाने वाटप करण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत पोलीस अंमलदार निवासस्थानासाठी २१ पोलीस अंमलदार प्रतीक्षा यादीवर आहेत. राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय यांचेकडून अधिकारी, अंमलदारांची सेवानिवृत्ती, बदली इत्यादी कारणांमुळे निवासस्थानांच्या वाटपाबाबत अहवाल कार्यालयात मंजुरीसाठी आल्यानंतर प्रतिक्षा यादीवरील पुढील अंमलदारांना त्या निवासस्थानाचे आवश्यकतेबाबत पुन्हा एकदा विचारणा होऊन वाटप करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली