गायमुख घाट रस्त्याला पावसाचा फटका

मायक्रो सर्फेसिंगचे काम अपूर्ण


ठाणे : ठाण्याहून वसई, गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर रोड महत्त्वाचा मानला जातो. अशातच या मार्गावरील गायमुख घाट रस्त्यावरील चढण आणि पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. यंदादेखील या मार्गावरील ५०० मीटरच्या रस्त्याच्या कामासाठी १० ते १५ दिवसांचा ब्लॉक घेऊनदेखील अद्यापही या रस्त्याच्या मायक्रो सर्फेसिंगचे काम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे या कामाला विलंब झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


मुंबई, पालघर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अशातच पावसाळ्यात उड्डाणपुलावरील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो व वाहतूक कोंडीत भर पडत असते. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने चढण-कमी करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला; मात्र त्याला वन विभागाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही.


त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गायमुख घाटातील त्या ५०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार यंदादेखील या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.गायमुख घाट ठाण्याच्या हद्दीत असून, त्यातील काही भाग प्रचंड चढणीचा आणि तेवढ्याच उताराचा आहे. तसेच घाटावर मोठे वळणदेखील असल्याने यावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी घाटाची दुरुस्ती करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर येते. गेल्यावर्षी या घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण करून त्यावर डांबराचा थर टाकला होता; मात्र पाऊस सुरू होताच काही दिवसांतच तो थर उकडल्याने रस्त्याची अवस्था पुन्हा कठीण झाली होती. त्यामुळे तो वाहनांची कोंडी करणारा ठरतो.

Comments
Add Comment

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे