गायमुख घाट रस्त्याला पावसाचा फटका

मायक्रो सर्फेसिंगचे काम अपूर्ण


ठाणे : ठाण्याहून वसई, गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर रोड महत्त्वाचा मानला जातो. अशातच या मार्गावरील गायमुख घाट रस्त्यावरील चढण आणि पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. यंदादेखील या मार्गावरील ५०० मीटरच्या रस्त्याच्या कामासाठी १० ते १५ दिवसांचा ब्लॉक घेऊनदेखील अद्यापही या रस्त्याच्या मायक्रो सर्फेसिंगचे काम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे या कामाला विलंब झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


मुंबई, पालघर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अशातच पावसाळ्यात उड्डाणपुलावरील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो व वाहतूक कोंडीत भर पडत असते. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने चढण-कमी करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला; मात्र त्याला वन विभागाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही.


त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गायमुख घाटातील त्या ५०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार यंदादेखील या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.गायमुख घाट ठाण्याच्या हद्दीत असून, त्यातील काही भाग प्रचंड चढणीचा आणि तेवढ्याच उताराचा आहे. तसेच घाटावर मोठे वळणदेखील असल्याने यावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी घाटाची दुरुस्ती करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर येते. गेल्यावर्षी या घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण करून त्यावर डांबराचा थर टाकला होता; मात्र पाऊस सुरू होताच काही दिवसांतच तो थर उकडल्याने रस्त्याची अवस्था पुन्हा कठीण झाली होती. त्यामुळे तो वाहनांची कोंडी करणारा ठरतो.

Comments
Add Comment

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक