गायमुख घाट रस्त्याला पावसाचा फटका

मायक्रो सर्फेसिंगचे काम अपूर्ण


ठाणे : ठाण्याहून वसई, गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर रोड महत्त्वाचा मानला जातो. अशातच या मार्गावरील गायमुख घाट रस्त्यावरील चढण आणि पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. यंदादेखील या मार्गावरील ५०० मीटरच्या रस्त्याच्या कामासाठी १० ते १५ दिवसांचा ब्लॉक घेऊनदेखील अद्यापही या रस्त्याच्या मायक्रो सर्फेसिंगचे काम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे या कामाला विलंब झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


मुंबई, पालघर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अशातच पावसाळ्यात उड्डाणपुलावरील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो व वाहतूक कोंडीत भर पडत असते. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने चढण-कमी करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला; मात्र त्याला वन विभागाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही.


त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गायमुख घाटातील त्या ५०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार यंदादेखील या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.गायमुख घाट ठाण्याच्या हद्दीत असून, त्यातील काही भाग प्रचंड चढणीचा आणि तेवढ्याच उताराचा आहे. तसेच घाटावर मोठे वळणदेखील असल्याने यावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी घाटाची दुरुस्ती करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर येते. गेल्यावर्षी या घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण करून त्यावर डांबराचा थर टाकला होता; मात्र पाऊस सुरू होताच काही दिवसांतच तो थर उकडल्याने रस्त्याची अवस्था पुन्हा कठीण झाली होती. त्यामुळे तो वाहनांची कोंडी करणारा ठरतो.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र