गायमुख घाट रस्त्याला पावसाचा फटका

  47

मायक्रो सर्फेसिंगचे काम अपूर्ण


ठाणे : ठाण्याहून वसई, गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर रोड महत्त्वाचा मानला जातो. अशातच या मार्गावरील गायमुख घाट रस्त्यावरील चढण आणि पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. यंदादेखील या मार्गावरील ५०० मीटरच्या रस्त्याच्या कामासाठी १० ते १५ दिवसांचा ब्लॉक घेऊनदेखील अद्यापही या रस्त्याच्या मायक्रो सर्फेसिंगचे काम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे या कामाला विलंब झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


मुंबई, पालघर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अशातच पावसाळ्यात उड्डाणपुलावरील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो व वाहतूक कोंडीत भर पडत असते. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने चढण-कमी करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला; मात्र त्याला वन विभागाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही.


त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गायमुख घाटातील त्या ५०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार यंदादेखील या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.गायमुख घाट ठाण्याच्या हद्दीत असून, त्यातील काही भाग प्रचंड चढणीचा आणि तेवढ्याच उताराचा आहे. तसेच घाटावर मोठे वळणदेखील असल्याने यावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी घाटाची दुरुस्ती करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर येते. गेल्यावर्षी या घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण करून त्यावर डांबराचा थर टाकला होता; मात्र पाऊस सुरू होताच काही दिवसांतच तो थर उकडल्याने रस्त्याची अवस्था पुन्हा कठीण झाली होती. त्यामुळे तो वाहनांची कोंडी करणारा ठरतो.

Comments
Add Comment

मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा! मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेतील

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन ठाणे  : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात

सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया

बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण