पोलिसांची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांची बनावट कृषी रसायने जप्त

चित्तोडगड : तेलंगणा पोलिसांनी राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकली. धाड टाकून पोलिसांनी राजू चेचानी याला अटक केली. याआधी पोलिसांनी हैदराबादमधील ई राजेशच्या गोदामावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांची बनावट कृषी रसायने जप्त केली होती. याच प्रकरणात पोलिसांनी राजू चेचानी याला अटक केली. या कारवाईमुळे भारतातील कृषी क्षेत्राला असलेला बनावट कीटकनाशकांचा वाढता धोका उघडकीस आला आहे.

बनावट कीटकनाशके वाजवी दरात विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. एकदम खऱ्या ब्रँडसारखी पॅक केलेली ही बनावट रसायने शेतीसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे तसेच त्यातील घातक घटकांमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. नुकत्याच झालेल्या अटकेमुळे अशा प्रकाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त होते आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या बनावट कृषी रसायनांची पुरवठा साखळी तोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चेचानी मागील सात वर्षांपासून अकरा पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट कृषी रसायनांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत होता, असा आरोप पोलिसांनी त्याच्यावर केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चेचानी दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रतिष्ठित कृषी रसायन कंपन्यांचे लेबल लावलेली बनावट उत्पादने शेतकऱ्यांना वाजवी दरात विकत होता. या प्रकरणात पुढील पोलीस कारवाई आणि तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

'उबाठा' पुन्हा फुटली; सहा खासदार शिंदेंच्या गळाला

संजय राऊत यांचाही दुजोरा; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत दाखल मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Sanchita Suicide Case : संचिता उगले आत्महत्या प्रकरणात आता नव्हे वळण ; मैत्रिणीने सांगितलं एक नवीन सत्य

मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी