नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने केलेली विनंती मान्य केली असून, पीजी नीट परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, पण परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने तारीख निश्चित केली.


परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे न्यायालयाने आदेश देताना सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला. ३० मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यासाठी एनबीईला परवानगी देत आहोत. यापुढे वेळ वाढवून दिला जाणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.


याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तुम्हाला दोन महिने वेळ का हवाय, असा प्रश्नही न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला केला होता. त्यावर एनबीईने तांत्रिक कारणे आणि केंद्राची निवड करण्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल, असे सांगितले. कोर्टाने त्याला परवानगी दिली.


न्यायमूर्ती पी.के मिश्रा यांनी मंडळाला तुम्हाला ३ ऑगस्ट पर्यंत वेळ हवा आहे. पण, तुम्हाला इतका वेळ का हवा आहे? असा प्रश्न विचारला होता. ए.जी. मसीह म्हणाले की, ३० मे रोजी न्यायालयाने आदेश देऊनही तुम्ही अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही. मग तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे? विलंब होण्यास हेही कारण आहे. तुम्हाला दोन महिन्यांचा वेळ का हवाय? यावर एनबीईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, जवळपास २.५ लाख विद्यार्थी आणि ४५० परीक्षा केंद्र आहेत. जर परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असेल, तर ५०० केंद्राची गरज आहे. त्यामुळे केंद्रांची निवड करणे, सुरक्षेची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करण्यासंदर्भात वेळ लागणार आहे, असे एनबीईने कोर्टात सांगितले होते.त्यानंतर कोर्टाकडून वेळ वाढवून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.