कोकणातला जुना वाडा, नवी पिढी आणि ‘अंधार माया’ वेब सीरिजचा गूढ प्रवास

'अंधार माया' ही वेब सिरीज कोकणातील पारंपरिक वाडा, तिथली गूढता आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी याभोवती फिरते. खातू कुटुंब त्यांच्या पूर्वजांच्या श्राद्धासाठी कोकणातल्या त्यांच्या मूळ वाड्यावर एकत्र येतं, पण प्रत्येकाचं या भेटीमागचं कारण वेगळं असतं. काहींना वाडा विकायचा असतो, काहींना त्याचं जतन करायचं असतं.


पहिल्याच सीनमधून प्रेक्षकांना ही केवळ कुटुंबकथा नसून, गूढतेने वेढलेली गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. प्रसंग काही वेळा अतिशय वेगात घडतात, तर कधी खूप संथ. त्यामुळे काही वेळा गोंधळ उडतो, पण तरीसुद्धा कथा आपल्या पकडीत ठेवते.


या सगळ्यात एक पात्र सतत हजेरी लावतं. कधी ते भूतकाळ असतं, कधी वर्तमान, तर कधी येणाऱ्या संकटाची सावली!


कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर किशोर कदम यांनी साकारलेला ‘गोण्या’ लक्षात राहतो. अनुप बेलवलकर, ऋतुजा बागवे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, शुभंकर तावडे यांनी आपापल्या भूमिका छान रंगवल्या आहेत. लहान मुलांची कामंही लक्षात राहतात.



दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी कोकणातील वातावरण, अंधार आणि उजेड यांचा मेळ छान साधला आहे. प्रल्हाद कुडतरकर यांची कथा आणि संवाद परिणामकारक ठरतात, तर संगीत आणि साऊंड डिझाइन देखील गोष्टीला पूरक वाटतं.


दशावताराचा केलेला प्रतीकात्मक वापर, कोकणी भाषेचे अधूनमधून ऐकू येणारे शब्द हे सगळं प्रेक्षकांना कोकणाच्या मुळाशी जोडतं.


एकूणच, ‘अंधार माया’ ही वेब सीरिज एक वेगळी आणि विचार करायला लावणारी अनुभव आहे. दुसरा सिझन यावा, अशी तुमच्याही मनात इच्छा राहील!

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय