'अंधार माया' ही वेब सिरीज कोकणातील पारंपरिक वाडा, तिथली गूढता आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी याभोवती फिरते. खातू कुटुंब त्यांच्या पूर्वजांच्या श्राद्धासाठी कोकणातल्या त्यांच्या मूळ वाड्यावर एकत्र येतं, पण प्रत्येकाचं या भेटीमागचं कारण वेगळं असतं. काहींना वाडा विकायचा असतो, काहींना त्याचं जतन करायचं असतं.
पहिल्याच सीनमधून प्रेक्षकांना ही केवळ कुटुंबकथा नसून, गूढतेने वेढलेली गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. प्रसंग काही वेळा अतिशय वेगात घडतात, तर कधी खूप संथ. त्यामुळे काही वेळा गोंधळ उडतो, पण तरीसुद्धा कथा आपल्या पकडीत ठेवते.
या सगळ्यात एक पात्र सतत हजेरी लावतं. कधी ते भूतकाळ असतं, कधी वर्तमान, तर कधी येणाऱ्या संकटाची सावली!
कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर किशोर कदम यांनी साकारलेला ‘गोण्या’ लक्षात राहतो. अनुप बेलवलकर, ऋतुजा बागवे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, शुभंकर तावडे यांनी आपापल्या भूमिका छान रंगवल्या आहेत. लहान मुलांची कामंही लक्षात राहतात.
मुंबई : प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'हेड ऑफ स्टेट' सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू होती. ...
दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी कोकणातील वातावरण, अंधार आणि उजेड यांचा मेळ छान साधला आहे. प्रल्हाद कुडतरकर यांची कथा आणि संवाद परिणामकारक ठरतात, तर संगीत आणि साऊंड डिझाइन देखील गोष्टीला पूरक वाटतं.
दशावताराचा केलेला प्रतीकात्मक वापर, कोकणी भाषेचे अधूनमधून ऐकू येणारे शब्द हे सगळं प्रेक्षकांना कोकणाच्या मुळाशी जोडतं.
एकूणच, ‘अंधार माया’ ही वेब सीरिज एक वेगळी आणि विचार करायला लावणारी अनुभव आहे. दुसरा सिझन यावा, अशी तुमच्याही मनात इच्छा राहील!