कोकणातला जुना वाडा, नवी पिढी आणि ‘अंधार माया’ वेब सीरिजचा गूढ प्रवास

'अंधार माया' ही वेब सिरीज कोकणातील पारंपरिक वाडा, तिथली गूढता आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी याभोवती फिरते. खातू कुटुंब त्यांच्या पूर्वजांच्या श्राद्धासाठी कोकणातल्या त्यांच्या मूळ वाड्यावर एकत्र येतं, पण प्रत्येकाचं या भेटीमागचं कारण वेगळं असतं. काहींना वाडा विकायचा असतो, काहींना त्याचं जतन करायचं असतं.


पहिल्याच सीनमधून प्रेक्षकांना ही केवळ कुटुंबकथा नसून, गूढतेने वेढलेली गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. प्रसंग काही वेळा अतिशय वेगात घडतात, तर कधी खूप संथ. त्यामुळे काही वेळा गोंधळ उडतो, पण तरीसुद्धा कथा आपल्या पकडीत ठेवते.


या सगळ्यात एक पात्र सतत हजेरी लावतं. कधी ते भूतकाळ असतं, कधी वर्तमान, तर कधी येणाऱ्या संकटाची सावली!


कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर किशोर कदम यांनी साकारलेला ‘गोण्या’ लक्षात राहतो. अनुप बेलवलकर, ऋतुजा बागवे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, शुभंकर तावडे यांनी आपापल्या भूमिका छान रंगवल्या आहेत. लहान मुलांची कामंही लक्षात राहतात.



दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी कोकणातील वातावरण, अंधार आणि उजेड यांचा मेळ छान साधला आहे. प्रल्हाद कुडतरकर यांची कथा आणि संवाद परिणामकारक ठरतात, तर संगीत आणि साऊंड डिझाइन देखील गोष्टीला पूरक वाटतं.


दशावताराचा केलेला प्रतीकात्मक वापर, कोकणी भाषेचे अधूनमधून ऐकू येणारे शब्द हे सगळं प्रेक्षकांना कोकणाच्या मुळाशी जोडतं.


एकूणच, ‘अंधार माया’ ही वेब सीरिज एक वेगळी आणि विचार करायला लावणारी अनुभव आहे. दुसरा सिझन यावा, अशी तुमच्याही मनात इच्छा राहील!

Comments
Add Comment

चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

ठाणे : हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा