जागतिक पर्यावरण दिन भिवंडीत ८०० वृक्षारोपण

  59

उद्यानांत कांचन, बहावा, जांभूळ, आंबा, बकुळसह रक्तचंदनाचीही लागवड


भिवंडी :पर्यावरणाच्या दृष्टीने शासन धोरणानुसार मान्सून काळात २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त झाडे लावणे धोरणानुसार जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या उद्यान/वृक्षप्राधिकरण विभागामार्फत महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. १ कार्यक्षेत्रातील नव्याने विकसीत होणाऱ्या उद्यानांत मा. अति-आयुक्त विठ्ठल डाके यांच्या शुभहस्ते तसेच इमरान वली मोह खान, माजी उपमहापौर, भिवंडी मनपा उपआयुक्त बाळकृष्ण क्षिरसागर, सहायक आयुक्त शैलेश दोंदे, सहाय्यक आयुक्त, नितीन पाटील, सहाय्यक आयुक्त अजित महाडीक, सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र. १ मकसुम शेख, वसिम शेख, उपअभियंता, फैजल तातली, आरोग्य विभाग, श्रीकांत परदेशी, जनसंपर्क अधिकारी, भिवंडी मनपा व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, आगाज महिला बचत गटाच्या महिला व मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित वृक्षरोपणांचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत प्रभाग समिती क्र. १ कार्यक्षेत्रातील उद्यानांत कांचन, बहावा, जांभुळ, आंबा, बकुळ, रक्तचंदन इ. २०० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.


तसेच मनपाच्या प्रभाग क्र. २ कार्यक्षेत्रातील भादवड स्मशानभूमी आवरात २०० बांबू वृक्षरोपांची लागवड करण्यात आली अाहे. प्रभाग समिती क्र. 3 कार्यक्षेत्रात वऱ्हाळा तलाव उद्यान परिसरामध्ये १००झाडांची वृक्षरोपण करण्यात आलेली आहे. तसेच प्रभाग समिती क्र. ४ कार्यालयासमोर उपलब्ध जागी १०० स्थानिक प्रजातीच्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आलेले आहे. मनपाच्या दिवानशहा दर्गा तलाव परिसरात २०० झाडे लावण्यात आली आहेत.अशा प्रकारे महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकुण- ८०० वृक्षरोपण करण्यात आले असून, त्यांचे जतन व संवर्धन करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मा. अति- आयुक्त विठ्ठल डाके यांनी कार्यक्रमस्थळी केले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या