तिकीट तपासणी मोहिमेतून पश्चिम रेल्वेने वसूल केले ४३ कोटी दंड वसुली

  45

मुंबई: मुंबई उपनगरीय लोकल, मेल/एक्स्प्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कसून तिकीट तपासणी मोहिम राबविली. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी पथकांनी एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमेत ४३.५४ कोटी रुपये वसूल केले. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील ११.७१ कोटी रुपयांचाही समावेश आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, मे २०२५ दरम्यान ३.०२ लाख तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना शोधून २१.६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले, ज्यामध्ये न बुक केलेल्या सामानाची प्रकरणे देखील समाविष्ट आहेत. तसेच, मे २०२५ मध्ये, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात १.०४ लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आणि ५.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अचानक तिकीट तपासणी मोहिमा देखील नियमितपणे राबवल्या जात आहेत. या मोहिमांच्या परिणामी, एप्रिल ते मे २०२५ पर्यंत १०३०० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड करण्यात आला आणि सुमारे ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे पश्चिम रेल्वे सर्वसामान्यांना आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना