तिकीट तपासणी मोहिमेतून पश्चिम रेल्वेने वसूल केले ४३ कोटी दंड वसुली

मुंबई: मुंबई उपनगरीय लोकल, मेल/एक्स्प्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कसून तिकीट तपासणी मोहिम राबविली. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी पथकांनी एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमेत ४३.५४ कोटी रुपये वसूल केले. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील ११.७१ कोटी रुपयांचाही समावेश आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, मे २०२५ दरम्यान ३.०२ लाख तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना शोधून २१.६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले, ज्यामध्ये न बुक केलेल्या सामानाची प्रकरणे देखील समाविष्ट आहेत. तसेच, मे २०२५ मध्ये, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात १.०४ लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आणि ५.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अचानक तिकीट तपासणी मोहिमा देखील नियमितपणे राबवल्या जात आहेत. या मोहिमांच्या परिणामी, एप्रिल ते मे २०२५ पर्यंत १०३०० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड करण्यात आला आणि सुमारे ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे पश्चिम रेल्वे सर्वसामान्यांना आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात